किमान तापमान : 31.01° C
कमाल तापमान : 32.33° C
तापमान विवरण : clear sky
आद्रता : 71 %
वायू वेग : 4.52 Mps
स्थळ : Mumbai, IN
32.33° C
29.12°C - 32.99°C
sky is clear29.33°C - 31.9°C
few clouds28.86°C - 31.58°C
sky is clear28.78°C - 30.34°C
broken clouds28.76°C - 30.2°C
scattered clouds28.59°C - 30.45°C
overcast cloudsसीडीएस रावत यांची भूमिका,
नवी दिल्ली, १२ नोव्हेंबर – पाकिस्तान हा भारताचा पहिल्या क्रमांकाचा शत्रू नाही, तर चीन आहे, अशी स्पष्ट भूमिका तिन्ही सशस्त्र दलांचे सेनापती (सीडीएस) जनरल बिपीन रावत यांनी आज शुक्रवारी विशद केली.
मागील काही महिन्यांपासून भारत-चीन सीमेवर तणाव कायम आहे. याचसंदर्भात बिपीन रावत यांनी एका वृत्तवाहिनीवरील कार्यक्रमात सहभागी होत आपली भूमिका मांडली. प्रत्यक्ष नियंत्रण रेषेच्या परिसरात सैन्यकपात करण्याऐवजी सैनिकांची संख्या आणखी वाढविण्याचा आमचा उद्देश आहे. यामागील मुख्य कारण पाकिस्तान नाही तर चीन आहे. हा देश सातत्याने भारताचा भूभाग बळकविण्याचा प्रयत्न करीत असतो, असे रावत म्हणाले. भारताला भविष्यात एकाचवेळी दोन्ही आघाड्यांवर या शत्रूंचा सामना करावा लागू शकतो, असेही रावत यांनी सांगितले.
अरुणाचलच्या सीमेजवळ चीनने गाव वसवले असल्याच्या बातम्यांसंदर्भातही रावत यांनी मत व्यक्त केले. चीनच्या लष्कराने आधीचे बांधकाम पाडून नवीन बांधकाम उभारले आहे. चीन त्यांच्या बाजूच्या सीमा भागात विकासकामे करीत आहे. आजच्या अत्याधुनिक काळात लोकांना उपग्रह किंवा गुगलच्या माध्यमातून छायाचित्र मिळतात. यापूर्वी असे तंत्रज्ञान उपलब्ध नव्हते. असेच एखादे छायाचित्र समोर आल्यानंतर घुसखोरी आणि ताबा मिळवल्याच्या चर्चा होतात, असे रावत म्हणाले.
भारतही करीत आहे विकास कामे
चीन त्यांच्या सीमा भागांमध्ये विकास कामे करीत आहे, त्याचप्रमाणे भारतही प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरील आपल्या भागांमध्ये मोठ्या प्रमाणात विकास कामे करीत आहे. आधी आपण सीमेवरील आजूबाजूच्या परिसरात रस्ते बांधत नव्हतो. चिनी सैनिक येऊन रस्ते तोडतील, नुकसान करतील, अशी भीती आधी मनात होती. मात्र, आता तसे वातावरण राहिले नाही, असा दावा रावत यांनी केला.
संघर्ष टाळण्यावर दोन्ही देशांचा प्रयत्न
गलवान खोर्यातील संघर्षानंतर भारत आणि चीनचे सैन्य अनेकदा एकमेकांसमोर उभे ठाकले होते. सैनिकांनी सीमेवर इतक्या जवळ येऊ नये, संघर्ष होऊ नये, यासाठी दोन्ही देश प्रयत्न करीत आहेत. सीमेवर ‘जैसे थे’ स्थिती कायम ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे, असेही रावत म्हणाले.