|
|
पंचांग Vrittabharati
मास : | वार : | तिथी :
नक्षत्र : | राशी :
करण : | योग :
सूर्योदय : 05:56 | सूर्यास्त : 18:50
अयनांश :
हवामान

किमान तापमान : 27.99° C

कमाल तापमान : 29.19° C

तापमान विवरण : few clouds

आद्रता : 83 %

वायू वेग : 4.8 Mps

स्थळ : Mumbai, IN

27.99° C

Weather Forecast for
Tuesday, 14 May

27.99°C - 31.46°C

few clouds
Weather Forecast for
Wednesday, 15 May

29.45°C - 32.44°C

sky is clear
Weather Forecast for
Thursday, 16 May

29.12°C - 32°C

light rain
Weather Forecast for
Friday, 17 May

29.07°C - 29.97°C

scattered clouds
Weather Forecast for
Saturday, 18 May

28.55°C - 30.4°C

few clouds
Weather Forecast for
Sunday, 19 May

29.13°C - 30.61°C

sky is clear
Home » राष्ट्रीय, संरक्षण » भारताच्या प्रत्युत्तरात १० पाकी सैनिक ठार

भारताच्या प्रत्युत्तरात १० पाकी सैनिक ठार

भारताचे चार जवान शहीद,
श्रीनगर, १३ नोव्हेंबर – पाकिस्तानच्या सैनिकांनी आज शुक्रवारी जम्मू-काश्मीरच्या गुरेझ आणि उरी सेक्टरमधील नियंत्रण रेषेवर अनेक ठिकाणी बेछूट गोळीबार आणि तोफांचा मारा केला. भारतीय जवानांनी दिलेल्या सडेतोड प्रत्युत्तरात पाकिस्तानचे १० सैनिक ठार झाले असून, काही जण जखमीही झाले आहेत. परंतु, यात सुरक्षा दलाचे चार जवान शहीद झाले असून, सहा नागरिकांचाही मृत्यू झाला आहे. पाच जवान जखमीही झाले आहेत.
पाकी सैनिकांच्या बंदुका व तोफा आज सकाळपासूनच आग ओकू लागल्या होत्या. उरी येथील नम्बाला येथे पाकी गोळीबारात दोन जवानांना वीरमरण आले, तर हाजी पीर भागात सीमा सुरक्षा दलाचा अधिकारी शहीद झाला. कमलकोट सेक्टरमध्ये दोन नागरिकांना आपला जीव गमवावा लागला, तर बालाकोट भागात एका महिलेचा मृत्यू झाला. काही नागरिक जखमीही झाले असल्याचे संरक्षण प्रवक्ते कर्नल राजेश कालिया यांनी सांगितले. वीरमरण आलेल्या जवानांमध्ये काटोल येथील भूषण रामेश्‍वर सतई आणि कोल्हापूर जिल्ह्यातील ऋषिकेश जोंधळे यांचा समावेश आहे.
पाकिस्तानी मार्‍याला भारतीय जवानांनी त्याच भाषेत उत्तर दिले. तोफांचा जोरदार मारा करीत, जवानांनी व्याप्त काश्मिरातील पाकी सैनिकांच्या अनेक चौक्यांना लक्ष्य करीत, तोफगोळे डागले. यात १० पाकी सैनिक ठार झाले असून, काही जखमीही झाले आहेत. ठार झालेल्या पाकी सैनिकांचा आकडा यापेक्षाही जास्त असण्याची शक्यता आहे. पाकिस्तानच्या अनेक चौक्या जवानांनी उद्‌ध्वस्त केल्या. ठार झालेल्यांमध्ये पाकिस्तानच्या तीन वरिष्ठ कमांडोंचा समावेश आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली. भारतीय जवानांच्या मार्‍यात आमचे मोठे नुकसान झाले असल्याची कबुली पाकी लष्करानेही दिली आहे. या दोन्ही सेक्टरमधून मोठ्या प्रमाणात अतिरेकी भारतात घुसविण्याचा पाकिस्तानचा डाव होता, पण जवानांनी तो सडेतोड प्रत्युत्तर देत उधळला. सुमारे १५ अतिरेकी केरन सेक्टरमधून घुसखोरीच्या तयारीत होते. त्यांच्या हालचाली टिपल्यानंतर जवानांनी अधिकच तीव्र मारा केला. व्याप्त काश्मिरात पाकी सैनिक आणि अतिरेक्यांमध्ये पळापळ सुरू झाली होती. भारतीय जवानांच्या आक्रमक मार्‍यामुळे अतिरेक्यांना सीमेपर्यंतही येता आले नाही, असे कालिया यांनी सांगितले.

Posted by : | on : 14 Nov 2020
Filed under : राष्ट्रीय, संरक्षण
Author Description : .
You can follow any responses to this entry through the RSS 2.0
You can leave a response or trackback to this entry

Related posts

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g