किमान तापमान : 27.99° C
कमाल तापमान : 29.19° C
तापमान विवरण : few clouds
आद्रता : 83 %
वायू वेग : 4.8 Mps
स्थळ : Mumbai, IN
27.99° C
27.99°C - 31.46°C
few clouds29.45°C - 32.44°C
sky is clear29.12°C - 32°C
light rain29.07°C - 29.97°C
scattered clouds28.55°C - 30.4°C
few clouds29.13°C - 30.61°C
sky is clearभारताचे चार जवान शहीद,
श्रीनगर, १३ नोव्हेंबर – पाकिस्तानच्या सैनिकांनी आज शुक्रवारी जम्मू-काश्मीरच्या गुरेझ आणि उरी सेक्टरमधील नियंत्रण रेषेवर अनेक ठिकाणी बेछूट गोळीबार आणि तोफांचा मारा केला. भारतीय जवानांनी दिलेल्या सडेतोड प्रत्युत्तरात पाकिस्तानचे १० सैनिक ठार झाले असून, काही जण जखमीही झाले आहेत. परंतु, यात सुरक्षा दलाचे चार जवान शहीद झाले असून, सहा नागरिकांचाही मृत्यू झाला आहे. पाच जवान जखमीही झाले आहेत.
पाकी सैनिकांच्या बंदुका व तोफा आज सकाळपासूनच आग ओकू लागल्या होत्या. उरी येथील नम्बाला येथे पाकी गोळीबारात दोन जवानांना वीरमरण आले, तर हाजी पीर भागात सीमा सुरक्षा दलाचा अधिकारी शहीद झाला. कमलकोट सेक्टरमध्ये दोन नागरिकांना आपला जीव गमवावा लागला, तर बालाकोट भागात एका महिलेचा मृत्यू झाला. काही नागरिक जखमीही झाले असल्याचे संरक्षण प्रवक्ते कर्नल राजेश कालिया यांनी सांगितले. वीरमरण आलेल्या जवानांमध्ये काटोल येथील भूषण रामेश्वर सतई आणि कोल्हापूर जिल्ह्यातील ऋषिकेश जोंधळे यांचा समावेश आहे.
पाकिस्तानी मार्याला भारतीय जवानांनी त्याच भाषेत उत्तर दिले. तोफांचा जोरदार मारा करीत, जवानांनी व्याप्त काश्मिरातील पाकी सैनिकांच्या अनेक चौक्यांना लक्ष्य करीत, तोफगोळे डागले. यात १० पाकी सैनिक ठार झाले असून, काही जखमीही झाले आहेत. ठार झालेल्या पाकी सैनिकांचा आकडा यापेक्षाही जास्त असण्याची शक्यता आहे. पाकिस्तानच्या अनेक चौक्या जवानांनी उद्ध्वस्त केल्या. ठार झालेल्यांमध्ये पाकिस्तानच्या तीन वरिष्ठ कमांडोंचा समावेश आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली. भारतीय जवानांच्या मार्यात आमचे मोठे नुकसान झाले असल्याची कबुली पाकी लष्करानेही दिली आहे. या दोन्ही सेक्टरमधून मोठ्या प्रमाणात अतिरेकी भारतात घुसविण्याचा पाकिस्तानचा डाव होता, पण जवानांनी तो सडेतोड प्रत्युत्तर देत उधळला. सुमारे १५ अतिरेकी केरन सेक्टरमधून घुसखोरीच्या तयारीत होते. त्यांच्या हालचाली टिपल्यानंतर जवानांनी अधिकच तीव्र मारा केला. व्याप्त काश्मिरात पाकी सैनिक आणि अतिरेक्यांमध्ये पळापळ सुरू झाली होती. भारतीय जवानांच्या आक्रमक मार्यामुळे अतिरेक्यांना सीमेपर्यंतही येता आले नाही, असे कालिया यांनी सांगितले.