किमान तापमान : 29.37° C
कमाल तापमान : 29.99° C
तापमान विवरण : scattered clouds
आद्रता : 74 %
वायू वेग : 3.59 Mps
स्थळ : Mumbai, IN
29.99° C
28.67°C - 30.56°C
few clouds28.15°C - 30.49°C
sky is clear28°C - 30.33°C
sky is clear27.64°C - 29.82°C
sky is clear27.9°C - 30.46°C
sky is clear28.28°C - 30.44°C
broken cloudsनवी दिल्ली, (१७ ऑगस्ट) – भारतातील पर्वतीय भाग सध्या महापुराशी झुंज देत आहेत. हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये मुसळधार पावसामुळे नद्यांना पूर आला आहे. अनेक ठिकाणी भूस्खलनामुळे विध्वंस होताना दिसत आहे. आकाशी आपत्तीमुळे सर्वत्र हाहाकार माजला आहे. भारतातील या दोन्ही डोंगराळ राज्यांमध्ये मान्सूनने कहर केला आहे. २४ जूनपासून हिमाचलमध्ये २१४ लोकांचा मृत्यू झाला आहे. तर ३८ जण बेपत्ता आहेत. राज्यात पाऊस आणि भूस्खलनाच्या घटनांमध्ये १०,००० घरांचे नुकसान झाले आहे. त्याचवेळी, उत्तराखंडमध्ये मान्सूनचे आगमन झाल्यापासून आतापर्यंत ५२ जणांचा मृत्यू झाला आहे. तर १९ जण बेपत्ता आहेत. राज्याचे ६५० कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे.
हिमाचलमध्ये रविवारपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे शिमला, सोलनसह अनेक जिल्ह्यांमध्ये भूस्खलन झाले. शिमला, समर हिल, फागली आणि कृष्णा नगरमध्ये भूस्खलनाचा सर्वाधिक फटका बसला. राज्यात पाऊस आणि भूस्खलनामुळे तीन दिवसांत ७१ जणांचा मृत्यू झाला आहे. तर १३ जण बेपत्ता आहेत. पाऊस-पूर आणि भूस्खलनामुळे राज्यातील पायाभूत सुविधांचे मोठे नुकसान झाले आहे. सीएम सुखविंदर सिंग सुखू यांनी पायाभूत सुविधांच्या पुनर्बांधणीचे काम डोंगरासारखे आव्हान असल्याचे वर्णन केले. हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री सुखू म्हणाले की, या पावसाळ्यात अतिवृष्टीमुळे राज्याचे सुमारे १०,००० कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. पाऊस आणि भूस्खलनामुळे उद्ध्वस्त झालेल्या पायाभूत सुविधांच्या पुनर्बांधणीसाठी वर्षभराचा कालावधी लागणार आहे. मुख्यमंत्री म्हणाले, रस्ते आणि जलप्रकल्पांच्या पुनर्बांधणीला वेळ लागतो. मात्र आम्ही प्रक्रियेला गती देते.
सीएम सखू यांनी सांगितले की, आर्मी, एअर फोर्स, एनडीआरएफ आणि एसडीआरएफ पूरग्रस्त भागातील लोकांना बाहेर काढण्यात गुंतले आहेत, पोलीस आणि होमगार्डचे जवानही या प्रक्रियेत सहभागी झाले आहेत. कृष्णा नगरमध्ये मंगळवारी झालेल्या भूस्खलनात एकामागून एक सुमारे ८ घरे कोसळली. त्याचा व्हिडिओही समोर आला आहे. भूस्खलनात दोन जणांचा मृत्यू झाला आहे. परिसरात पावसामुळे दरड कोसळण्याची शक्यता असल्याने १५ घरे रिकामी करण्यात आली असून लोकांना सुरक्षित स्थळी पाठवण्यात आले आहे. शिक्षण विभागाने १९ ऑगस्ट रोजी राज्यातील सर्व शाळा, महाविद्यालये आणि शैक्षणिक संस्था बंद ठेवल्या आहेत. अधिकार्यांनी सांगितले की, भूस्खलनामुळे राज्यभरातील रस्ते खराब झाले आहेत. २४ जूनपासून पावसाळा सुरू झाल्यापासून राज्यात सुमारे ८०० रस्ते बंद आहेत आणि १०,७१४ घरांचे पूर्ण किंवा अंशतः नुकसान झाले आहे.
हवामान खात्याच्या म्हणण्यानुसार, हिमाचल प्रदेशात यावर्षी मान्सूनच्या ५४ दिवसांत ७४२ मिमी पाऊस झाला आहे, तर १ जून ते ३० सप्टेंबर दरम्यान हंगामाची सरासरी ७३० मिमी आहे. शिमला हवामान केंद्राचे संचालक सुरिंदर पॉल यांनी सांगितले की, राज्यात या जुलैमध्ये झालेल्या पावसाने गेल्या ५० वर्षातील सर्व रेकॉर्ड मोडले आहेत. याआधी जुलै महिन्यात हिमाचल प्रदेशातील मंडी, कुल्लू, शिमला येथे पाऊस आणि पुरामुळे मोठे नुकसान झाले होते. या विध्वंसात शेकडो रस्ते, पूल आणि पायाभूत सुविधांचे नुकसान झाले. छॄठऋ ने बुधवारी सांगितले की, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड आणि पंजाबमधील अतिवृष्टी आणि पुरामुळे प्रभावित झालेल्या भागात ९६० हून अधिक लोकांना वाचवण्यात आले आहे, तर १०,००० हून अधिक लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले आहे. या राज्यांमध्ये एनडीआरएफच्या २९ तुकड्या तैनात आहेत. तर १४ जणांना स्टँडबाय ठेवण्यात आले आहे.
उत्तराखंडमध्येही मान्सूनच्या पावसाने कहर केला आहे. मान्सूनच्या आगमनानंतर राज्यात आतापर्यंत ५२ जणांचा मृत्यू झाला आहे. तर ३७ जण जखमी झाले आहेत. १९ जण बेपत्ता आहेत. सोमवारपासून उत्तराखंडमध्ये मुसळधार पाऊस पडत आहे. सोमवारपासून राज्यात आतापर्यंत ६ जणांचा मृत्यू झाला आहे. उत्तराखंडमध्ये अनेक ठिकाणी १९ ऑगस्टपर्यंत यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. पूर आणि भूस्खलन झालेल्या भागात लोकांना घराबाहेर न पडण्याचा इशारा देण्यात आला आहे. इतकंच नाही तर हरिद्वारमध्ये गंगेच्या पाण्याची पातळी धोक्याच्या चिन्हाच्या अगदी खाली राहिली आहे. ऋषिकेशमध्ये गंगेच्या पाण्याने घाटाच्या काठावर असलेल्या भागात पाणी भरले. डेहराडूनच्या विकासनगर तहसीलमधील लंगा जाखन गावात भूस्खलनामुळे १५ घरे जमीनदोस्त झाली. मात्र, कोणतीही जीवित वा वित्तहानी झाली नाही. उत्तराखंडमधील रुद्रप्रयाग जिल्ह्यात पूल कोसळल्याने शेकडो भाविक मदमहेश्वर मंदिरात अडकले होते. सर्व २९३ यात्रेकरूंची सुटका करण्यात आली आहे. यापैकी २४० यात्रेकरूंना एअरलिफ्ट करण्यात आले. तर ५३ जणांना रोप रिव्हर क्रॉसिंगच्या साहाय्याने बाहेर काढण्यात आले.