किमान तापमान : 28.13° C
कमाल तापमान : 28.7° C
तापमान विवरण : clear sky
आद्रता : 71 %
वायू वेग : 2.97 Mps
स्थळ : Mumbai, IN
28.7° C
27.24°C - 29.75°C
sky is clear27.35°C - 30.45°C
sky is clear27.78°C - 31.16°C
sky is clear28.27°C - 30.45°C
sky is clear27.83°C - 29.94°C
sky is clear27.45°C - 29.78°C
sky is clear– देशात २,२१० नव्या विमानांची गरज भासणार,
नवी दिल्ली, (१२ मे) – भारतात विमान विक्री आणि सेवाक्षेत्रांमध्ये वेगाने मोठी वाढ होत आहे. आपली कंपनी सुद्धा सर्व क्षमता जोपासत भागीदारांसोबत काम करेल, असे मत बोईंग कमर्शियल एअरप्लेनचे उपाध्यक्ष रेयान विअर यांनी व्यक्त केले. त्यांनी यावेळी गो-फर्स्ट कंपनीसमोर उभ्या ठाकलेल्या इंजीनसंबंधी अडचणींवरील उपाययोजनांचाही ऊहापोह केला.
चालू वर्षाच्या सुरुवातीला बोईंगने भारताला पुढील २० वर्षांच्या कालावधीत सुमारे २ हजार २१० नव्या विमानांची गरज भासेल, असा अंदाज वर्तविला होता. शिवाय २०४१ पर्यंत देशाअंतर्गत विमान वाहतुकीत वार्षिक ७ टक्के वाढ होणार असल्याचेही म्हटले होते. यानंतर आज थेट अमेरिकन विमान उत्पादक कंपनी बोईंगने भारतातील प्रवासी वाहतूक आणि विमानांच्या बाजारासंदर्भात सकारात्मक वक्तव्य केले. भारतात विमान विक्री आणि सेवाक्षेत्रांमध्ये वेगाने आणि मोठी वाढ होत असून, यात अनेक संधी निर्माण झाल्याचे रेयान विअर यांनी म्हटले.
गो-फर्स्ट कंपनीसमोर उद्भवलेल्या संकटांबाबत रेयान विअर यांनी स्पष्ट केले की, बोईंग भागीदारांसोबत काम करीत आहे. अशाप्रकारच्या मुद्यांच्या निवारणासाठी आपल्या संपूर्ण क्षमतांचा उपयोग करणार असल्याचेही त्यांनी प्रामुख्याने नमूद केले. दरम्यान, विमान प्रवासी वाहतूक कंपनी गो फर्स्ट सध्या आर्थिक संकटांशी सामना करीत आहे. त्यामुळे आपल्या अनेक उड्डाणांना रद्द करण्यात आले.