किमान तापमान : 31.18° C
कमाल तापमान : 33.72° C
तापमान विवरण : few clouds
आद्रता : 55 %
वायू वेग : 7.33 Mps
स्थळ : Mumbai, IN
33.72° C
29.44°C - 34.99°C
few clouds29.2°C - 30.98°C
sky is clear28.84°C - 31.52°C
sky is clear29.09°C - 30.78°C
sky is clear28.67°C - 30.85°C
few clouds28.79°C - 30.28°C
light rainअहमदाबाद, (२८ मे) – भारताला चीनकडून अत्यंत गंभीर आव्हान निर्माण केले जात आहे. सीमाभागात चीनकडून कोणताही एकतर्फी बदल केला जाणार नाही, हे सुनिश्चित करण्यासाठी केंद्र सरकारकडून पावले उचलली गेली आहेत, असे प्रतिपादन परराष्ट्र व्यवहार मंत्री एस. जयशंकर यांनी केले.
मागील तीन वर्षांत सीमावर्ती भागात हे आव्हान अधिक होते. दोन्ही देशांना संबंधांमध्ये समतोल साधावा लागले, परंतु ते दुसर्या पक्षाच्या अटींवर असू शकत नाही. दोन्ही देशांमधील शांतता आणि स्थैर्य बिघडले तर, त्यांच्या संबंधांवर कोणताही परिणाम होणार नाही, असे जयशंकर यांनी ‘मोदीज इंडिया : अ रायझिंग पॉवर’ या विषयावर भाषण देताना सांगितले.
मी जेव्हा मोठ्या शक्तीबाबत बोलतो, तेव्हा नक्कीच आमच्यासमोर चीनकडून एक विशिष्ट आव्हान असते. हे आव्हान अत्यंत किचकट आहे; मात्र मागील तीन वर्षांत ते विशेषतः सीमावर्ती भागांत दिसून आले आहे, असे चीनच्या लडाखमधील घुसखोरीच्या संदर्भात जयशंकर यांनी सांगितले. आवश्यक आहे तिथे स्पष्टपणे प्रत्युत्तर दिले जाते आणि अशा प्रकारचे प्रत्युत्तर यापूर्वीही दिले आहेत. सीमावर्ती भागातील स्थिती एकतर्फी बदलण्याचा कोणताही प्रयत्न केला जाणार नाही, हे सुनिश्चित करण्यासाठी अशा प्रकारचे प्रत्युत्तर देण्यात आले असल्याचे जयशंकर यांनी सांगितले.