किमान तापमान : 28.87° C
कमाल तापमान : 29.99° C
तापमान विवरण : few clouds
आद्रता : 74 %
वायू वेग : 3.87 Mps
स्थळ : Mumbai, IN
29.99° C
28.44°C - 30.23°C
sky is clear27.95°C - 30.46°C
sky is clear27.64°C - 30.2°C
sky is clear27.48°C - 29.63°C
sky is clear27.57°C - 30.3°C
sky is clear27.89°C - 30.3°C
scattered clouds– केरळमध्ये पंतप्रधान मोदी यांचे संबोधन,
– देशाच्या ताकदीचा लाभ स्थलांतरितांना,
नवी दिल्ली, (२५ एप्रिल) – पंतप्रधान नरेंद्र मोदी केरळच्या दोन दिवसांच्या दौर्यावर आहेत. आज मंगळवारी तिरुवनंतपुरममध्ये डिजिटल सायन्स पार्कची पायाभरणी केली. त्यांच्या दोन दिवसांच्या दौर्यात, पंतप्रधान मोदी केरळमध्ये ३,२०० कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या प्रकल्पांची पायाभरणी आणि उद्घाटन करतील. पंतप्रधान कार्यालय नुसार, डिजिटल सायन्स पार्क ही शैक्षणिक संस्थांच्या सहकार्याने उद्योग आणि व्यावसायिक घटकांद्वारे डिजिटल उत्पादने आणि सेवा विकसित करण्यासाठी एक प्रमुख संशोधन सुविधा म्हणून आहे.
डिजिटल सायन्स पार्कमध्ये अख, डेटा अॅनालिटिक्स, सायबर सिक्युरिटी, स्मार्ट मटेरियल इ. सारख्या इंडस्ट्री ४.० तंत्रज्ञानाच्या क्षेत्रातील उत्पादनांच्या विकासाला समर्थन देण्यासाठी सामान्य सुविधा असतील. या प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यासाठी प्रारंभिक गुंतवणूक सुमारे २०० कोटी रुपये आहे, तर एकूण प्रकल्प खर्च अंदाजे १,५१५ कोटी रुपये आहे. आदल्या दिवशी पंतप्रधान मोदींनी केरळच्या पहिल्या वंदे भारत एक्सप्रेसला हिरवा झेंडा दाखवला, जी तिरुअनंतपुरम ते कासारगोडपर्यंत धावेल. तिरुवनंतपुरम सेंट्रल स्टेशनवर पंतप्रधान मोदींनी वंदे भारत एक्सप्रेसला हिरवा झेंडा दाखवला.
शहराशी अखंड कनेक्टिव्हिटीसाठी बॅटरीवर चालणार्या इलेक्ट्रिक हायब्रीड बोटींद्वारे कोचीच्या आजूबाजूच्या १० बेटांना जोडणारा देशातील अशा प्रकारचा पहिला प्रकल्प कोची वॉटर मेट्रोचेही पंतप्रधान उद्घाटन करतील. कोची वॉटर मेट्रो व्यतिरिक्त, दिंडीगुल-पलानी-पलक्कड विभागाच्या रेल्वे विद्युतीकरणाचेही पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे. कार्यक्रमादरम्यान, पंतप्रधान तिरुवनंतपुरम, कोझिकोड आणि वर्कला शिवगिरी रेल्वे स्थानकांच्या पुनर्विकासासह विविध रेल्वे प्रकल्पांची पायाभरणी करतील.
रेल्वे प्रकल्पांच्या उद्घाटन आणि पायाभरणीनंतर केलेल्या भाषणात पंतप्रधान म्हणाले की, भारताच्या वाढत्या सामर्थ्याचा फायदा परदेशात राहणार्या प्रवासींनाही मिळत आहे. गेल्या ९ वर्षांपासून, भारतात कनेक्टिव्हिटीच्या पायाभूत सुविधांवर अभूतपूर्व वेगाने काम केले जात आहे. आज आम्ही देशाच्या सार्वजनिक वाहतूक आणि लॉजिस्टिक क्षेत्राला पूर्णपणे नवसंजीवनी देत
आहोत. आम्ही भारतीय रेल्वेच्या सुवर्णयुगाकडे वाटचाल करत आहोत. पंतप्रधान आपल्या भाषणात पुढे म्हणाले की, देशाच्या सार्वजनिक वाहतुकीचे आधुनिकीकरण करण्याच्या दिशेने आम्ही आणखी एक प्रयत्न केला आहे. स्थानिक परिस्थितीला अनुरूप ’मेड इन इंडिया’ सोल्यूशन्स देण्याचा आमचा प्रयत्न आहे. सेमी हायस्पीड ट्रेन्स असो, रो-रो फेरी असो, रोप-वे असो, जिथे गरज असेल तिथे अशा यंत्रणा तयार केल्या जात आहेत.
Short URL : https://vrittabharati.in/?p=52220