किमान तापमान : 28.61° C
कमाल तापमान : 30.2° C
तापमान विवरण : broken clouds
आद्रता : 81 %
वायू वेग : 2.09 Mps
स्थळ : Mumbai, IN
30.2° C
28.72°C - 31.5°C
overcast clouds28.3°C - 30.98°C
overcast clouds28.49°C - 30.83°C
scattered clouds28.55°C - 30.18°C
scattered clouds28.48°C - 30.64°C
broken clouds28.45°C - 30.7°C
light rainकार्यकारिणीच्या बैठकीचा समारोप,
रायपूर, (२६ फेब्रुवारी ) – काँग्रेस पक्ष अनेक आव्हानांचा सामना करीत आहे. यावर मात करणे शक्य आहे. यासाठी आवश्यकता आहे पक्षात एकता, शिस्त आणि निर्धाराची. राहुल गांधी यांनी काढलेल्या भारत जोडो यात्रेमुळे नव्या काँग्रेसचा युगारंभ झाला आहे, असे प्रतिपादन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी रविवारी येथे केले.
नवा रायपूर येथे तीन दिवसांपासून सुरू असलेल्या काँग्रेस कार्यकारिणीच्या बैठकीचा आज समारोप झाला. यावेळी समारोपीय भाषणात खरगे बोलत होते. आज कदाचित अधिवेशन संपले, पण नव्या काँगे‘सची सुरुवात झाली, असे ते म्हणाले. आज आपल्यापुढे अनेक आव्हाने उभी ठाकली आहेत. आपण ती हाताळू शकतो. मात्र, त्यासाठी एकता आणि शिस्तीची गरज आहे. काँग्रेस मजबूत असणे यातच आपली खरी ताकद आहे. राष्ट्रीय स्तरावर आपला व्यवहार तळागाळातील कोट्यवधी कार्यकर्त्यांना प्रभावित करणारा असावा, असे खडगे यांनी सांगितले.
मोदींची अदानींवर विशेष कृपा
खरगे यांनी आपल्या भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर हल्ला चढविला. काही लोक देशाची संपत्ती लुटत आहेत. जनतेच्या पैशातून संपत्ती खरेदी करून मोदी यांचे सरकार एका विशिष्ट व्यक्तीला देत आहेत. मोदी सरकारने अदानी यांची जितकी मदत केली आहे, तितकी मदत आजपर्यंत कोणत्याही व्यावसायिकाची करण्यात आलेली नाही, असा आरोप खरगे यांनी केला.
‘‘अनेक गोष्टी काळानुसार बदलत असतात. लोकांच्या आशा आणि अपेक्षाही बदलल्या आहेत. नवीन आव्हाने उभी झाली आहेत, पण त्यावर मात करण्यासाठी नवे मार्गही समोर आले आहेत. राजकीय आणि सामाजिक कार्याचा मार्ग कधीच बंद होत नसतो. आपण केवळ वाटचाल करायला हवी. आपल्या अनेक पिढ्या याच मार्गावर चालल्या आहेत आणि भविष्यातही चालणार आहेत.’’
मल्लिकार्जुन खरगे