किमान तापमान : 30.18° C
कमाल तापमान : 30.18° C
तापमान विवरण : clear sky
आद्रता : 65 %
वायू वेग : 5.54 Mps
स्थळ : Mumbai, IN
30.18° C
27.32°C - 30.22°C
sky is clear27.98°C - 31.12°C
sky is clear28.13°C - 30.39°C
few clouds27.9°C - 30.05°C
sky is clear27.63°C - 29.93°C
sky is clear27.75°C - 29.94°C
few cloudsनवी दिल्ली, १५ जानेवारी – राजस्थानच्या लोंगेवाल येथील भारत आणि पाकिस्तानच्या सीमाभागात आज शनिवारी लष्कर दिनी जगातील सवारत मोठा तिरंगा फडकविण्यात आला. विशेष म्हणजे, हा तिरंगा संपूर्ण खादीचा आहे. हा तिरंगा पाहण्यासाठी या भागात नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती.
केंद्रीय सुक्ष्म, लघु आणि मध्यम उपक्रम मंत्रालयातील सूत्राने याबाबत माहिती देताना सांगितले की, भारत आणि पाकिस्तानमध्ये १९९१ मध्ये लढल्या गेलेल्या युद्धात लोंगेवाल हे ठिकाण ऐतिहासिक असेच होते. यामुळेच जगातील हा सवारत मोठा तिरंगा फडकविण्यासाठी लोंगेवालची निवड करण्यात आली.
मागील वर्षी २ ऑक्टोबर रोजी लडाखच्या लेह येथे सर्वप्रथम भव्य राष्ट्रीय ध्वज फडकविण्यात आला होता. तेव्हापासून विविध ठिकाणी भव्य तिरंगा फडकविण्याची आजची पाचवी वेळ आहे. यापूर्वी, खादीचा तिरंगा ८ ऑक्टोबर रोजी भारतीय हवाई दलाच्या एका विशेष कार्यक्रमानिमित्त हिंडन एअरबेसवर आणि त्यानंतर २१ ऑक्टोबर रोजी लाल किल्ल्यावर फडकविण्यात आला होता. यानंतर ४ डिसेंबर रोजी नौदल स्थापना दिनानिमित्त मुंबईतील गेटवे ऑफ इंडियाजवळ असलेल्या नौदलाच्या डॉकयार्ड येथे खादीचा तिरंगा फडकविण्यात आला होता.
खादी व ग्रामोद्योग आयोगाचा पुढाकार देशभरात आझादी का अमृत महोत्सव साजरा करण्यात येत असल्याने, जगातील सवारत मोठा खादीचा तिरंगा तयार करण्यासाठी खादी व ग्रामोद्योग आयोगाने पुढाकार घेतला होता. हा तिरंगा २२५ फूट लांब आणि १५० फूट रुंद असून, त्याचे वजन १४०० किलोगॅ्रम इतके आहे. आजच्या ऐतिहासिक क्षणी आयोगाने हा तिरंगा आज लष्कराच्या सुपूर्द केला. ७० कारागिरांनी ४९ दिवसांत या तिरं१?२याची रचना केली आहे. यासाठी ३५०० मनुष्यतास लागले. या तिरंग्याच्या मधोमध ३० फुटाचे अशोक चक्र विणण्यात आले आहे.