किमान तापमान : 28.13° C
कमाल तापमान : 28.7° C
तापमान विवरण : clear sky
आद्रता : 71 %
वायू वेग : 2.97 Mps
स्थळ : Mumbai, IN
28.7° C
27.24°C - 29.75°C
sky is clear27.35°C - 30.45°C
sky is clear27.78°C - 31.16°C
sky is clear28.27°C - 30.45°C
sky is clear27.83°C - 29.94°C
sky is clear27.45°C - 29.78°C
sky is clear-ग्लोबल मेरिटाईम इंडिया समिटनिमित्त बैठक,
नवी दिल्ली, (१४ ऑगस्ट) – जगातील समुद्रविकास क्षेत्रात भारताची भूमिका मोठी असून, सामुद्रिक क्रांतीच्या दिशेने वेगवान प्रवास करत आहे, असे प्रतिपादन केंद्रीय जहाज वाहतूक तसेच जलमार्ग मंत्री सर्बानंद सोनोवाल यांनी केले.येत्या ऑक्टोबरमध्ये ग्लोबल मेरिटाईम इंडिया समिट आयोजित करण्यात आली असून, यानिमित्ताने ते शनिवारी एका बैठकीत बोलत होते. यावेळी ४० पेक्षा अधिक देशांच्या राजदूतांनी सहभाग घेतला होता.
जागतिकीकरणाच्या युगात समुद्री क्षेत्र आर्थिक विकासाचे प्रमुख मार्ग बनले आहे. ही बाब हेरत भारताने देशातील बंदरे आणि जलमार्गांमध्ये क‘ांतिकारी बदल करण्याचे निश्चित केले. कारण हेच मार्ग जागतिक स्तरावर व्यापाराचे सूत्रधार बनत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या क्षेत्राचे महत्त्व लक्षात घेत सागरमाला योजना पुढे आणली. याशिवाय मोठ्या प्रमाणात विदेशी गुंतवणुकीला संधी दिली असल्याचे केंद्रीय मंत्री सर्बानंद सोनोवाल यांनी स्पष्ट केले.