किमान तापमान : 27.46° C
कमाल तापमान : 27.67° C
तापमान विवरण : clear sky
आद्रता : 60 %
वायू वेग : 2.76 Mps
स्थळ : Mumbai, IN
27.67° C
27.48°C - 30.59°C
sky is clear27.68°C - 30.66°C
sky is clear27.95°C - 30.89°C
sky is clear28.22°C - 30.48°C
few clouds27.91°C - 30.08°C
sky is clear27.65°C - 29.6°C
few cloudsनवी दिल्ली, (१४ जुलै) – युरोपियन युनियनच्या ब्रुसेल्स-आधारित संसदेने मणिपूर हिंसाचार संदर्भात एक ठराव मंजूर केला. संसदेने भारतीय अधिकार्यांना वांशिक आणि धार्मिक हिंसाचार थांबवण्याचे आणि सर्व धार्मिक अल्पसंख्याकांच्या संरक्षणासाठी उपाययोजना करण्याचे आवाहन केले. प्रत्युत्तरादाखल भारताने हा प्रस्ताव अस्वीकार्य असल्याचे आणि वसाहतवादी मानसिकता असल्याचे सांगून नाकारले. परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची म्हणाले की, भारताच्या अंतर्गत बाबींमध्ये असा हस्तक्षेप अस्वीकार्य आहे आणि ते वसाहतवादी मानसिकता दर्शवते.
ते म्हणाले की युरोपीय संसदेने मणिपूरच्या विकासावर चर्चा करून तथाकथित तातडीचा ठराव स्वीकारल्याचे आपण पाहिले आहे. ते म्हणाले की, न्यायव्यवस्थेसह सर्व स्तरावरील भारतीय अधिकार्यांना मणिपूरमधील परिस्थितीची जाणीव आहे. शांतता, सौहार्द आणि कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी आम्ही पावले उचलत आहोत. परराष्ट्र सचिव विनय क्वात्रा यांनी सांगितले की, संबंधित युरोपियन युनियन खासदारांशी संपर्क साधला जात आहे आणि त्यांना हे स्पष्ट करण्यात आले आहे की ही संपूर्णपणे भारताची अंतर्गत बाब आहे. मणीपूरमधील परिस्थिती नावाचा हा प्रस्ताव युरोपियन संसदेतील समाजवादी आणि डेमोक्रॅट्सच्या प्रोग्रेसिव्ह अलायन्स ग्रुपचे युरोपियन संसद सदस्य (एमईपी) यांनी सुरू केला होता. पारित झालेल्या ठरावावर संसदेच्या प्रेस स्टेटमेंटमध्ये म्हटले आहे की, संसद भारतीय अधिकार्यांना वांशिक आणि धार्मिक हिंसाचार ताबडतोब थांबवण्याचे आणि सर्व धार्मिक अल्पसंख्याकांच्या संरक्षणासाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्याचे आवाहन करते.
एमईपी ने भारतीय अधिकार्यांना हिंसाचाराच्या स्वतंत्र तपासाला परवानगी देण्याचे आवाहन केले आणि सर्व विवादित पक्षांना प्रक्षोभक विधाने करणे थांबवावे, विश्वास पुनर्संचयित करावा आणि तणाव निवळण्यासाठी तटस्थ भूमिका बजावावी असे आवाहन केले. फ्रान्समधील बॅस्टिल डे परेडमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी सन्माननीय पाहुणे म्हणून पोहोचले असताना युरोपियन संसदेत हा प्रस्ताव आला आहे. यापूर्वी अमेरिकेचे भारतातील राजदूत एरिक गार्सेटी यांनीही मणिपूर हिंसाचाराबद्दल चर्चा केली होती. ही राजकीय समस्या नसून मानवी समस्या असल्याचे त्यांनी कोलकाता येथील अमेरिकन सेंटरमध्ये पत्रकार परिषदेत सांगितले. हिंसाचारग्रस्त राज्यात शांततेसाठी आम्ही प्रार्थना करतो, असे ते म्हणाले होते. अमेरिकेकडून मदत मागितली तर आम्ही सर्व प्रकारे तयार आहोत, असेही ते म्हणाले होते. ही भारताची अंतर्गत बाब आहे हे आम्हाला माहीत आहे, असे त्यांनी आवर्जून सांगितले.