किमान तापमान : 30.37° C
कमाल तापमान : 32.78° C
तापमान विवरण : scattered clouds
आद्रता : 63 %
वायू वेग : 5.88 Mps
स्थळ : Mumbai, IN
32.78° C
28.53°C - 33.99°C
light rain29.38°C - 31.34°C
few clouds27.56°C - 32.11°C
light rain28.23°C - 30.85°C
light rain29.1°C - 31.23°C
sky is clear28.66°C - 30.63°C
moderate rainअहमदाबाद, (२७ सप्टेंबर) – भारताला जागतिक वृद्धीचे इंजिन बनवण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे आणि लवकरच देश आर्थिक शक्ती म्हणून उदयास येणार आहे, असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी व्यक्त केला. २० वर्षांपूर्वी ‘व्हायब्रँट गुजरात’चे बीज रोवले होते. आता याचा मोठा वृक्ष झाला असल्याचे मोदी यांनी ‘व्हायब्रँट गुजरात समिट’ला २० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त आयोजित कार्यक्रमात सांगितले. गुजरातला भारताच्या विकासाचे इंजिन म्हणून विकसित करण्यासाठी आम्ही ‘व्हायब्रँट गुजरात’ आयोजित करणे सुरू केले. भारताला जगाच्या विकासाचे इंजिन म्हणून विकसित करण्याचे उद्दिष्ट आम्ही २०१४ नंतर ठेवले, असे मोदी यांनी सांगितले.
भारत लवकरच जागतिक शक्ती म्हणून उदयास येईल, अशा टप्प्यावर आज आपण उभे आहोत. काही वर्षांनी भारत हा जगातील आघाडीच्या तीन अर्थव्यवस्थांपैकी एक असेल. लहान सुरुवातीनंतर ‘व्हायब्रँट गुजरात’ कशाप्रकारे मोठी संस्था झाले आणि कित्येक राज्यांनी त्याचे अनुकरण करून गुंतवणूक परिषदा आयोजित करणे सुरू केले, यावर मोदी यांनी प्रकाश टाकला. प्रत्येक काम तीन टप्प्यांतून जाते, असे स्वामी विवेकानंद म्हणायचे. विशेषतः काळाच्या समोर असल्यास पहिले त्याची थट्टा केली जाते, नंतर त्याला विरोध होतो आणि शेवटी ते स्वीकारले जाते, असे मोदी यांनी स्पष्ट केले.