किमान तापमान : 29.85° C
कमाल तापमान : 32.99° C
तापमान विवरण : few clouds
आद्रता : 49 %
वायू वेग : 7.05 Mps
स्थळ : Mumbai, IN
32.99° C
28.5°C - 32.99°C
sky is clear29.16°C - 32.09°C
sky is clear28.94°C - 31.81°C
sky is clear28.91°C - 31.63°C
sky is clear28.22°C - 29.85°C
sky is clear27.91°C - 29.27°C
sky is clearनवी दिल्ली, (२७ जुलै) – मणिपूरच्या मुद्द्यावरून सभागृहात प्रचंड गदारोळ सुरू आहे. पंतप्रधानांनी संसदेत मणिपूरवर विधान करावे, अशी मागणी विरोधी पक्ष सातत्याने करत आहेत. दरम्यान, २६ राजकीय पक्षांचा समावेश असलेल्या विरोधी आघाडीच्या आय.एन.डी.आय.ए. चे खासदार २९-३० जुलै रोजी हिंसाचारग्रस्त मणिपूरला भेट देऊ शकतात, असे मीडिया रिपोर्ट्सवर सांगण्यात येत आहे. या आठवड्याच्या अखेरीस २० खासदारांचे शिष्टमंडळ मणिपूरला भेट देऊन राज्यातील परिस्थितीचा आढावा घेणार असल्याची माहिती काँग्रेस नेते मणिकम टागोर यांनी दिली. टागोर म्हणाले की, विरोधी खासदारांना बर्याच दिवसांपासून हिंसाचारग्रस्त मणिपूरला भेट द्यायची होती परंतु तेथील परिस्थिती लक्षात घेऊन त्यांना परवानगी नाकारण्यात आली. राहुल गांधी यांनी यापूर्वी मणिपूरला भेट दिली होती.
दरम्यान विरोधी आघाडी आय.एन.डी.आय.ए. संसदेच्या पावसाळी अधिवेशनात एकत्र येऊन मणिपूरच्या मुद्द्यावर सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र, सरकारही विरोधी आघाडीला प्रत्युत्तर देत आहे. गुरुवारी राज्यसभेत परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांनीही विरोधकांवर जोरदार हल्ला चढवला. ते म्हणाले की, ’तुम्ही स्वत:ला भारत म्हणता, पण तुम्हाला भारताच्या राष्ट्रीय हितांबद्दल ऐकायचेही नाही, मग तुम्ही कोणत्या प्रकारचे भारत आहात? तुम्ही असा भारत आहात, जो राष्ट्रीय हिताचा त्याग करतोय, हा भारत नाही. दरम्यान मणिपूरमध्ये ३ मे रोजी जातीय हिंसाचार सुरू झाला. मणिपूरच्या मीतेई समुदायाच्या आदिवासी आरक्षणाच्या मागणीमुळे सुरू झालेल्या हिंसाचारात आतापर्यंत १६० हून अधिक लोक मारले गेले आहेत आणि हजारो विस्थापित झाले आहेत. संसदेचे पावसाळी अधिवेशन सुरू होण्याच्या एक दिवस आधी, मणिपूरमधील एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता, ज्यामध्ये दोन महिलांना लोकांच्या जमावाने नग्न धिंड काढण्यात आली. महिलांवर सामूहिक बलात्कारही झाला. या घटनेबाबत संपूर्ण देशात संताप व्यक्त केला जात आहे. या मुद्द्यावरून विरोधकही सरकारला घेराव घालत आहेत.