किमान तापमान : 28.29° C
कमाल तापमान : 28.99° C
तापमान विवरण : clear sky
आद्रता : 74 %
वायू वेग : 3.12 Mps
स्थळ : Mumbai, IN
28.99° C
27.24°C - 29.75°C
sky is clear27.35°C - 30.45°C
sky is clear27.78°C - 31.16°C
sky is clear28.27°C - 30.45°C
sky is clear27.83°C - 29.94°C
sky is clear27.45°C - 29.78°C
sky is clear– गुलाम नबी यांचा हल्लाबोल,
नवी दिल्ली, (११ ऑगस्ट) – डेमोक्रॅटिक प्रोग्रेसिव्ह आझाद पक्षाचे प्रमुख गुलाम नबी आझाद यांनी गुरुवारी लोकसभेतून अविश्वास ठरावावर विरोधकांचा सभात्याग अयोग्य ठरवला. ते म्हणाले, जर त्यांना मतदानापासून पळच काढायचा होता, तर मग त्यांनी हा प्रस्ताव आणायला नको होता. प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना आझाद म्हणाले की, या ठरावासाठी विरोधी पक्ष एकत्र आले होते, मात्र मतदानाची वेळ आल्यावर त्यांनी सभात्याग केला. भाजपाला सभागृहात बहुमत आहे, हे सर्वांना माहीत होते. अशा स्थितीत अविश्वास प्रस्ताव पुकारण्यात काय अर्थ आहे. त्यांनी योग्य काम केलेले नाही.
जेव्हा मला समजले की, विरोधकांनी सभात्याग केला, तेव्हा मी खूप निराश झालो. कारण, गेल्या दोन-चार महिन्यांपासून सर्वजण एकाच मुद्यावर एकवटले होते. मात्र, अविश्वास ठराव आल्यावर त्यांनी सभात्याग केला, असे सांगून आझाद म्हणाले की, रालोआ व्यतिरिक्त भाजपाचे सभागृहात स्वत:चे बहुमत आहे. पळून जायचे होते तर त्यांनी अविश्वास प्रस्ताव आणायला नको होता. कोणत्याही परिस्थितीत त्यांनी मतदान करायला हवे होते.
मोदी सरकारविरोधात विरोधी पक्षांनी आणलेला अविश्वास ठराव १० ऑगस्ट रोजी पडला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अविश्वास प्रस्तावाला उत्तर दिले. मोदींनी २ तास १२ मिनिटांचे भाषण केले, त्यात १ तास ३२ मिनिटे त्यांनी मणिपूरवर भाषण केले. विशेष बाब म्हणजे पंतप्रधान मणिपूरवर बोलू लागण्यापूर्वीच विरोधकांनी सभागृहातून सभात्याग केला होता. कारण काय, तर पंतप्रधान मणिपूर विषयावर बोलत नाही म्हणून…