किमान तापमान : 28.49° C
कमाल तापमान : 30.99° C
तापमान विवरण : scattered clouds
आद्रता : 79 %
वायू वेग : 2.89 Mps
स्थळ : Mumbai, IN
30.99° C
29.05°C - 31.7°C
broken clouds28.44°C - 30.08°C
scattered clouds28.52°C - 29.63°C
broken clouds28.46°C - 29.93°C
overcast clouds28.43°C - 30.02°C
light rain28.59°C - 29.86°C
light rainनवी दिल्ली, (१४ ऑक्टोबर) – मानव केंद्रित विकासासाठी काम करण्याचे आवाहन लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांनी आज केले. हरित ऊर्जा, डिजिटल क्रांती आणि महिलाभिमुख विकास एकविसव्या शतकात जगात मोठे बदल घडवून आणेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त कला. जी-२० देशातील संसदप्रमुखांच्या पी-२० या नवव्या शिखर परिषदेच्या उद्घाटनसत्रात परिषदेमागची पृष्ठभूमी स्पष्ट करताना बिर्ला म्हणाले की, नुकत्याच दिल्लीत झालेल्या जी-२० परिषदेत नवी दिल्ली घोषणापत्र सर्वसहमतीने स्वीकारण्यात आले. हे पंतप्रधान नरेंद्र मोदींचे प्रभावशाली नेतृत्व व वैश्विक दृष्टिकोनाचे द्योतक म्हणावे लागेल.
वैश्विक आव्हांनावर जी-२० देशांची एकजुटता आणि प्रतिबद्धतेचेही प्रतिकही आहे. लोकशाही हा आमचा अमूल्य वारसा आहे. लोकशाही आमच्या जीवनशैलीत, आचारविचारात आणि व्यवहारात आहे. एकप्रकारे संस्कृती आणि संस्काराचा अविभाज्य भाग आहे. त्यामुळेच देश स्वतंत्र झाला, त्यावेळी आम्ही संसदीय लोकशाहीचा स्वीकार केला.लोकशाही हा आमच्या आणि जबाबदारीचा मुळ आधार आहे. विशालता, विविधता आणि बहुलता भारतीय लोकशाहीची ओळख आहे.
परदेशी पाहुणे मान्यवरांची उपस्थिती
पी-२० देशांच्या शिखर परिषदेत ऑस्ट्रेलियाच्या हाऊस ऑफ रिप्रेझेंटिव्हचे सभापती मिल्टन डक, बांगला देशच्या जातीय संसदेच्या अध्यक्ष शिरिन शर्मिन चौधरी, संयुक्त अरब अमिरातच्या फेडरेशन नॅशनल कौन्सिलचे सभापती घोबाश, पॅन आफ्रिकनचे काळजीवाहू अध्यक्ष डॉ. अशेबिर वोल्डेगियोर्गिस यांच्यासह जी २० देशातील संसदेचे प्रमुख उपस्थित आहेत. या सर्वार्नी गुरुवारी रात्री लोकसभेचे सभापती बिर्ला यांची भेट घेत द्विपक्षीय मुद्यांवर चर्चा केली.