किमान तापमान : 28.56° C
कमाल तापमान : 30.18° C
तापमान विवरण : broken clouds
आद्रता : 81 %
वायू वेग : 2.22 Mps
स्थळ : Mumbai, IN
30.18° C
28.29°C - 30.99°C
overcast clouds28.45°C - 30.22°C
scattered clouds28.55°C - 29.67°C
broken clouds28.49°C - 30.14°C
broken clouds28.53°C - 30.25°C
light rain28.93°C - 29.93°C
light rainनवी दिल्ली, (२६ फेब्रुवारी ) – गेल्या काही दिवसपासून बातम्या समोर येत होत्या की, सोनिया गांधी राजकारणातून निवृत्ती घेणार आहेत. मात्र , काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी यांनी राजकारणातून निवृत्तीचे वृत्त फेटाळून लावले आहे. त्या म्हणाल्या मी कधीच निवृत्त झाली नव्हती आणि कधीच होणार नाही. सोनिया गांधींचे हे विधान आले आहे कारण त्यांच्या रायपूरमधील भावनिक भाषणानंतर सोनिया आता राजकारणातून निवृत्त होऊ शकतात, अशी शक्यता वर्तवली जात होती. या अटकळांना पूर्णविराम देण्यासाठीच त्यांचे हे वक्तव्य आले आहे. छत्तीसगडची राजधानी रायपूरमध्ये काँग्रेसचे ८५ वे अधिवेशन सुरू आहे.
रायपूर येथील काँग्रेस अधिवेशनात माजी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी भावनिक भाषण केले. सोनिया गांधी यांनी काँग्रेस अध्यक्ष म्हणून केलेल्या प्रवासाचा उल्लेख करत सहकार्याबद्दल आभार मानले. सोनिया गांधींच्या भाषणानंतर अशा प्रकारच्या अटकळांना जोर आला की सोनिया गांधी आता सक्रिय राजकारणातून निवृत्त झाल्या आहेत. सोनिया गांधींच्या या भावनिक भाषणानंतर त्यांच्या सक्रिय राजकारणातून निवृत्तीची अटकळ बांधली जात होती.तसेच त्या म्हणाल्या की, १९९८ मध्ये काँग्रेसचे अध्यक्षपद स्वीकारल्यानंतरच्या २५ वर्षात आपण खूप मोठे यश संपादन केले आहे तसेच निराशेचा काळही पाहिला आहे. मनमोहन सिंग यांच्या नेतृत्वाखाली २००४ आणि २००९ च्या लोकसभा निवडणुकीत मिळालेल्या विजयाचे सोनिया गांधींनी वर्णन केले.