किमान तापमान : 28.68° C
कमाल तापमान : 29.55° C
तापमान विवरण : clear sky
आद्रता : 75 %
वायू वेग : 3.44 Mps
स्थळ : Mumbai, IN
29.55° C
28.44°C - 30.23°C
sky is clear27.95°C - 30.46°C
sky is clear27.64°C - 30.2°C
sky is clear27.48°C - 29.63°C
sky is clear27.57°C - 30.3°C
sky is clear27.89°C - 30.3°C
scattered clouds– दरात तेजी राहणार,
नवी दिल्ली, (३० नोव्हेंबर) – भारतातील तूरटंचाईचा आणि जगभरातील तुरीच्या अल्प उपलब्धतेचा फायदा घेत मोझांबिकने भारताला होणार्या तूर निर्यातीवर निर्बंध लागू केले आहेत. अतिरिक्त नफ्यासाठी मोझांबिक भारताची ‘तूरकोंडी’ करण्याच्या प्रयत्नात आहे. देशांतर्गत बाजारात पुढील वर्षभर तुरीच्या दरात तेजी राहणार असली, तरीही फार दरवाढ होण्याची शक्यता नाही.
इंडियन पल्सेस अॅण्ड ग्रेन्स असोसिएशनचे अध्यक्ष बिमल कोठारी म्हणाले की, मोझांबिक भारताला तूर निर्यात करणारा सर्वांत मोठा देश आहे. देशाच्या एकूण आयातीत मोझांबिकचा वाटा ४० टक्के आहे. मागील आर्थिक वर्षी मोझांबिकमधून ४.६० लाख टन तुरीची आयात झाली होती. चालू आर्थिक वर्षात आजपर्यंत सुमारे दोन लाख टनांची आयात झाली आहे. जागतिक बाजारात तुरीची उपलब्धता कमी आहे. देशातील किरकोळ बाजारात तूरडाळीचे दर १९० रुपये प्रतिकिलोवर पोहोचले आहेत. या टंचाईच्या स्थितीचा फायदा घेण्यासाठी मोझांबिकने आपल्या तूर निर्यातीत घट केली आहे. मोझांबिक सरकारमधील काही अधिकारी आणि व्यापार्यांनी मिळून फक्त एकाच व्यापार्यामार्फत निर्यात सुरू केली आहे. वाढीव दराने भारताला तूर निर्यात करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे.
यंदा देशात तूर लागवडीत घट झाली आहे. कमी पाऊस, गारपीट, अवकाळी यासारख्या नैसर्गिक आपत्तींमुळे तुरीच्या उत्पादनात घट होण्याची शक्यता आहे. देशातील तूर डिसेंबर महिन्यात बाजारात येईल. म्यानमारमध्येही तुरीची काढणी सुरू झाली असून, म्यानमारची तूर जानेवारी महिन्यात देशाच्या बाजारात दाखल होण्याची शक्यता आहे. य शिवाय मालावी, इथोपिया आदी देशांतूनही आयातीचे नियोजन आहे. त्यामुळे पुढील वर्षभर दरातील तेजी कायम राहणार असली तरी, तुरीच्या दरात अतिरेकी वाढ होण्याची शक्यता नाही. एकूण जागतिक उपलब्धता आणि देशांतर्गत उत्पादनाचा अंदाज पाहता वर्षभर तुरीची हातातोंडाशी गाठ राहणार आहे.
अन्य देशांतून आयातीचा
अवेळी पावसामुळे नुकतेच तुरीचे मोठे नुकसान झाले आहे. देशात यंदा तुरीच्या उत्पादनात घट होण्याची शक्यता आहे. जगभरातील अन्य देशांतही तुरीचे उत्पादन कमी झाले आहे. संभाव्य दरवाढ रोखण्यासाठी केंद्र सरकार शेतकर्यांकडून हमीभावापेक्षा जास्त दराने म्हणजे बाजारभावाने तूर खरेदी करून साठा करीत आहे. पुढील वर्षभर तुरीची टंचाई राहण्याचा अंदाज आहे. या स्थितीची मोझांबिक सरकारला जाणीव असल्यामुळे ते अतिरिक्त फायद्यासाठी नियंत्रित निर्यात करताना दिसतात. मलावी, म्यानमार, इथिओपियातून तुरीची आयात करण्याचा पर्याय खुला आहे.