किमान तापमान : 28.98° C
कमाल तापमान : 30.99° C
तापमान विवरण : scattered clouds
आद्रता : 79 %
वायू वेग : 2.84 Mps
स्थळ : Mumbai, IN
30.99° C
28.55°C - 31.47°C
overcast clouds28.21°C - 30.3°C
overcast clouds28.45°C - 29.99°C
scattered clouds28.53°C - 29.71°C
broken clouds28.57°C - 29.92°C
light rain28.61°C - 30.12°C
light rainनिवडणूक आयोगाचा साकेत गोखलेंना दणका,
नवी दिल्ली, ३१ ऑक्टोबर – बिहार विधानसभा निवडणुकीसाठी भाजपाने दिलेल्या मोफत कोरोना लसीच्या आश्वासनामुळे आचारसंहितेचा भंग झालेला नाही, असे निवडणूक आयोगाने आज शनिवारी स्पष्ट केले आहे.
भाजपाच्या या आश्वासनामुळे आचारसंहितेतील कोणत्याही तरतुदीचा भंग झाल्याचे आढळले नाही, असे निवडणूक आयोगाने माहिती अधिकार कार्यकर्ते साकेत गोखले यांनी दाखल केलेल्या अर्जाला उत्तर देताना स्पष्ट केले. आदर्श आचारसंहितेतील कोणत्याही तरतुदीचे उल्लंघन झालेले नाही, असे आयोगाने म्हटले आहे.
हे आश्वासन भेदभाव करणारे आहे आणि निवडणुकीच्या कालावधीत केंद्र सरकारने अधिकारांचा गैरवापर केला, असा दावा गोखले यांनी केला होता. निवडणुकीतील जाहीरनाम्यासाठी निवडणूक आयोगाने काही दिशानिर्देश जारी केले आहेत. आचारसंहितेतील आठव्या भागानुसार मोफत लस वितरणाच्या आश्वासनामुळे आचारसंहितेचा भंग झालेला नाही, असे उत्तर आयोगाने दिल्याची माहिती सूत्रांनी दिली.
घटनेत नमूद केलेली राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्त्वे नागरिकांना विविध कल्याणकारी उपाययोजना आखण्याचे सुचवतात आणि म्हणून निवडणूक जाहीरनाम्यात अशा प्रकारच्या कल्याणकारी आश्वासनावर आक्षेप घेता येणार नाही, अशी यात तरतूद असल्याचे निवडणूक आयोगाने स्पष्ट केले. केंद्र सरकारने हे आश्वासन एका विशिष्ट राज्यासाठी दिले आहे, हे तथ्य निवडणूक आयोगाने धक्कादायकरीत्या फेटाळले आहे आणि निवडणुकीचे वातावरण बिघडल्यावर कारवाई केली जाते, असा आरोप निवडणूक आयोगाच्या उत्तरावर समाधान न झालेल्या साकेत गोखले यांनी शुक्रवारी ट्विट करून केला.