किमान तापमान : 30.19° C
कमाल तापमान : 31.99° C
तापमान विवरण : few clouds
आद्रता : 70 %
वायू वेग : 4.7 Mps
स्थळ : Mumbai, IN
31.99° C
27.32°C - 31.99°C
sky is clear27.98°C - 31.12°C
sky is clear28.13°C - 30.39°C
few clouds27.9°C - 30.05°C
sky is clear27.63°C - 29.93°C
sky is clear27.75°C - 29.94°C
few cloudsलष्करप्रमुख मनोज नरवणे यांचा इशारा,
नवी दिल्ली, ३ डिसेंबर –
१९७१ च्या युद्धाच्या काळात मी केवळ ११ वर्षांचा होतो. कुणाशी युद्ध व्हावे, असे मला मुळीच वाटत नाही, पण भविष्यात युद्ध झाले तर, भारताचे सैन्यदल शत्रूंचे हाल १९७१ सारखेच केल्याशिवाय राहणार नाही, असा स्पष्ट इशारा लष्करप्रमुख जनरल मनोज नरवणे यांनी आज शुक्रवारी दिला.
एका हिंदी वृत्तवाहिनीवरील मुलाखतीत ते बोलत होते. ‘सर्वांत मोठ्या विजयाची ५० वर्षे’ हा या मुलाखतीचा विषय होता. विशेष म्हणजे, आजच्या दिवशी १९७१ मध्ये भारतीय सैन्यदलांनी पाकिस्तानवर मोठा विजय मिळविला होता.
१९७१ च्या युद्धाच्या काळात माझे वडील दिल्लीत तैनात होते. युद्धाच्या तयारीला लागा, असे वडिलांना सांगण्यात आले होते. आम्ही खिडक्यांवर काळे कागद लावले. धोक्याचा सायरन वाजल्यानंतर आवश्यक त्या सूचना आम्ही पाळत होतो. मी देखील आजूबाजूच्या घरातील लोक आदेश पाळत आहेत का, हे तपासत होतो. त्याचवेळी मी लष्करात येण्याचा आणि लष्करप्रमुख होण्याचा निर्धार केला होता. या युद्धाच्या ९ वर्षांनंतर मी लष्करात सहभागी झालो. त्यावेळी मी द्वितीय लेफ्टनंट होतो, असे त्यांनी सांगितले.
आमच्या तिन्ही सैन्यदलांनी १९७१ चा विजय मिळविला होता. आम्ही सर्व एकत्र होतो. भविष्यात असे युद्ध झाले, तर आमचे सैन्यदल अशाच प्रकारचा मोठा विजय मिळवेल. या युद्धाला ५० वर्षे पूर्ण झाली आहेत. या काळात अनेक बदल झाले आहेत. आधीचे युद्ध आणि आताच्या युद्धांमध्ये बराच फरक आहे. आता युद्ध कसोटी सामन्यांसारखे राहिले नाही, तर ते टी-२० सारखे झाले आहे. तेव्हा तयारीसाठी वेळ मिळायचा. मात्र, आता अशी संधी मिळत नाही. आपल्याला नेहमीच सज्ज राहण्याची आवश्यकता आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.
समुद्री धोका परतविण्याचे सामर्थ्य नौदलात : आर. हरिकुमार
भारताच्या सागरी हिताचे रक्षण करण्यात आणि या क्षेत्रात निर्माण होणारा कोणताही धोका परतावून लावण्याचे सामर्थ्य नौदलाकडे आहे, असा विश्वास नौदलप्रमुख चीफ ऍडमिरल आर. हरिकुमार यांनी आज शुक्रवारी व्यक्त केला.
पत्रपरिषदेला संबोधित करताना आर. हरिकुमार म्हणाले की, जो सागरी भाग धोकादायक ठरू शकतो, त्या ठिकाणी भारताची स्थिती मजबूत करण्यावर आम्ही लक्ष केंद्रित केले आहे. अशा सर्व भागांची माहिती आम्ही प्राप्त केलेली आहे. पुढील वर्षीपर्यंत या सर्वच भागांमधील भारतीय सुरक्षा व्यवस्था अधिक मजबूत झालेली असेल. भारतीय नौदलाच्या एकूण कार्यक्षमतेत वाढ करण्यासाठी विविध आघाड्यांवर महिलांची भूमिकाही वाढविण्यात येत असल्याची माहिती त्यांनी दिली.
भारतीय समुद्रात चीनच्या वाढत्या कारवायांवरही आम्ही लक्ष ठेवून आहोत. चीनच्या प्रत्येक हालचालींवर आमची नजर आहे आणि या देशापासून उद्भवणारा कोणताही धोका परतावून लावण्यासाठी आम्ही सज्ज आहोत. सागरी मार्गाने देशाच्या सुरक्षेला कोणताही धोका निर्माण होणार नाही, याची ग्वाही मी देशवासीयांना देत आहे, असे त्यांनी सांगितले.
प्रमुख युद्धनौकांवर महिलांची नियुक्ती
भारतीय नौदलांमधील काही प्रमुख युद्धनौकांवर महिला अधिकार्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. आतापर्यंत १५ युद्धनौकांवर २८ महिला अधिकार्यांना नियुक्त करण्यात आले आहे, अशी माहितीही त्यांनी दिली.