|
|
पंचांग Vrittabharati
मास : | वार : | तिथी :
नक्षत्र : | राशी :
करण : | योग :
सूर्योदय : 05:57 | सूर्यास्त : 18:48
अयनांश :
हवामान

किमान तापमान : 29.36° C

कमाल तापमान : 29.99° C

तापमान विवरण : few clouds

आद्रता : 74 %

वायू वेग : 4.71 Mps

स्थळ : Mumbai, IN

29.99° C

Weather Forecast for
Saturday, 11 May

27.75°C - 29.99°C

sky is clear
Weather Forecast for
Sunday, 12 May

28.53°C - 30.88°C

light rain
Weather Forecast for
Monday, 13 May

28.53°C - 29.99°C

overcast clouds
Weather Forecast for
Tuesday, 14 May

28.42°C - 31.01°C

light rain
Weather Forecast for
Wednesday, 15 May

28.56°C - 30.95°C

sky is clear
Weather Forecast for
Thursday, 16 May

28.27°C - 30.81°C

light rain
Home » राजकीय, राष्ट्रीय » राहुल गांधींच्या समर्थनार्थ काँग्रेसचा देशभर सत्याग्रह

राहुल गांधींच्या समर्थनार्थ काँग्रेसचा देशभर सत्याग्रह

नवी दिल्ली, (२६ मार्च) – काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांची खासदारकी रद्द झाल्याने संतप्त झालेल्या काँग्रेस पक्षाने रविवारी राजधानी दिल्लीसह देशभरात सत्याग्रह आंदोलन केले. यावेळी भाजपावर हल्ला चढविताना, नीरव मोदी आणि ललित मोदीसारख्या पळपुट्यांवर केलेल्या टीकेमुळे भाजपाला वेदना का झाल्या, असा सवाल काँगे‘सचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खडगे यांनी उपस्थित केला.
काँग्रेसच्या नेत्यांना दिल्लीतील राजघाट येथे सत्याग्रहाचे आयोजन करायचे होते. मात्र, पोलिसांनी परवानगी नाकारल्याने पक्षाने महात्मा गांधी यांच्या पुतळ्याच्या बाहेरील परिसरात सत्याग्रह केला. काही राज्यांमध्ये आंदोलनाला हिंसक वळण देण्यात आल्याने आंदोलकांना अटकही करण्यात आली. गुजरातमध्ये पोलिसांनी शेकडो कार्यकर्त्यांना अटक केली. मध्य प्रदेशातही रेल्वे रोकण्याचा प्रयत्न करणार्या नेत्यांना ताब्यात घेण्यात आले.
दिल्लीत आंदोलकांना संबोधित करताना पक्षाच्या महासचिव प्रियांका वढेरा म्हणाल्या की, राहुल गांधी हे देशासाठी हुतात्मा झालेल्या पंतप‘धानांचा मुलगा आहे. ज्याने देशाच्या एकतेकरिता हजारो किलोमीटर पदयात्रा काढली ती व्यक्ती जगात कुठेही देशाचा अपमान करू शकत नाही. केंद्रातील मोदी सरकार अहंकारी झाले असून, त्याविरोधात आपण सर्वांनी एकत्र येऊन आवाज उठविण्याची गरज आहे.
राहुल गांधी यांच्यावर देशाचा अपमान केल्याचा आरोप भाजपा करीत आहे. माझ्या कुटुंबातील सदस्यांनी देशाच्या सन्मानाकरिता आहुती दिली आहे. लोकशाही मजबूत करण्याचे काम आम्ही केले आहे. मात्र, भाजपा सरकारमुळे लोकशाही धोक्यात आली आहे, अशी टीका प्रियांका वढेरा यांनी केली.

Posted by : | on : 27 Mar 2023
Filed under : राजकीय, राष्ट्रीय
Author Description : .
You can follow any responses to this entry through the RSS 2.0
You can leave a response or trackback to this entry

Related posts

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g