किमान तापमान : 31.85° C
कमाल तापमान : 34.61° C
तापमान विवरण : clear sky
आद्रता : 39 %
वायू वेग : 6.56 Mps
स्थळ : Mumbai, IN
34.61° C
29.18°C - 35.99°C
sky is clear29.02°C - 32.5°C
scattered clouds28.43°C - 31.89°C
sky is clear27.58°C - 30.78°C
few clouds27.35°C - 30.23°C
scattered clouds27.13°C - 30.31°C
few cloudsनवी दिल्ली, (२८ मार्च) – खासदार झाल्यानंतर बंगला रिकामा केल्याबद्दल राहुल गांधी यांनी लोकसभा सचिव डॉ.मोहित रंजन यांना उत्तर दिलं आहे. तुम्ही दिलेल्या आदेशाचे पालन करेन, असे काँग्रेस नेते राहूल गांधी यांनी म्हंटले म्हणाले. राहुल गांधींनी आपल्या पत्रात लिहिले आहे की, ’१२ तुघलक लेन येथील माझ्या घराचे वाटप रद्द करण्याबाबतच्या पत्राबद्दल धन्यवाद. लोकसभेचा निवडून आलेला सदस्य म्हणून मी ४ वेळा निवडून आलो आणि इथेच राहिलो. माझ्या चांगल्या आठवणीही इथे जोडल्या गेल्या आहेत. पुढे राहुल गांधींनी लिहिले की, कोणताही पूर्वग्रह न ठेवता मी तुमचा आदेश मानेन आणि बंगला रिकामा करेन.
राहुल गांधी यांना सोमवारीच लोकसभा सचिवालयाच्या वतीने बंगला रिकामा करण्याची नोटीस बजावण्यात आली होती. सचिवालयाने जारी केलेल्या आदेशात राहुल गांधी आता खासदार नाहीत, असे म्हटले होते. अशा परिस्थितीत लोकसभा सदस्य म्हणून त्यांना १२ तुघलक लेनमधील बंगला सोडावा लागेल. यासाठी राहुल गांधींना २३ एप्रिलपर्यंतची मुदत देण्यात आली होती. या नोटिशीला उत्तर देताना राहुल गांधी यांनी एक पत्र लिहिले आहे. राहुल गांधी म्हणाले की, लोकसभेचे ४ वेळा निवडून आलेले खासदार म्हणून मला हे निवासस्थान देण्यात आले होते आणि माझ्याशी चांगल्या आठवणी जोडल्या गेल्या आहेत. २००४ मध्ये अमेठीची जागा जिंकून राहुल गांधी खासदार झाले आणि २००५ पासून या बंगल्यात राहत होते. पण मोदी आडनावावर आक्षेपार्ह टिप्पणी केल्याबद्दल त्यांच्याविरुद्ध दाखल करण्यात आलेल्या मानहानीच्या खटल्यात न्यायालयाने त्यांना गेल्या आठवड्यात दोन वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावली होती. त्यामुळे त्यांचे संसद सदस्यत्व संपुष्टात आले. यानंतर त्यांना लोकसभा सचिवालयाने घर रिकामे करण्याची नोटीसही दिली होती. मात्र, काँग्रेसने या निर्णयावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत राहुल गांधींना झेड प्लस सुरक्षा आहे, त्यामुळे त्यांना निवासाचा हक्क आहे.