किमान तापमान : 30.31° C
कमाल तापमान : 32.99° C
तापमान विवरण : clear sky
आद्रता : 46 %
वायू वेग : 6.54 Mps
स्थळ : Mumbai, IN
32.99° C
29.18°C - 32.99°C
sky is clear29.15°C - 32.46°C
sky is clear28.48°C - 32.12°C
sky is clear27.63°C - 30.85°C
sky is clear27.53°C - 30.43°C
sky is clear27.47°C - 30.35°C
sky is clearनवी दिल्ली, (२८ मार्च) – काँग्रेसचे नेते राहुल गांधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बदनामीचा प्रयत्न करीत आहेत. त्यांचा हा प्रयत्न अपयशी ठरेल तसेच अभद्र टिप्पणीवर ओबीसी समाजाची माफी मागण्यास दिलेल्या नकाराच्या माध्यमातून गांधी कुटुंबाच्या राजकीय अहंकाराचा आणखी एक पुरावा समोर आला आहे, असा घणाघात भाजपाने मंगळवारी केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बदनामीचा प्रयत्न राहुल गांधी करीत आहेत. मात्र, देशातील नागरिक मोदींच्या पाठीशी असल्याने त्यात त्यांना यश मिळणार नाही, असे भाजपाच्या नेत्या आणि केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी येथे आयोजित पत्रपरिषदेत सांगितले.
नरेंद्र मोदी यांची प्रतिमा ही त्यांचे बलस्थान आहे आणि त्यांची प्रतिमा खंडित करण्याचा प्रयत्न केला जाईल, असे राहुल गांधी यांनी २०१९ मध्ये एका मासिकाला दिलेल्या मुलाखतीत म्हटले होते. या माध्यमातून राहुल गांधी यांचा राजकीय मनोविकार पूर्णपणे दिसून आला आहे. त्यांनी संसदेत मोदींना शिवीगाळ करीत, आरोप केले; परंतु ते सिद्ध करू शकले नाही, असे इराणी यांनी सांगितले.
आपण दिलेली आश्वासने पूर्ण करू शकलो नसल्याची निराशा राहुल गांधी यांच्या मनात आहे आणि त्यातून निर्माण झालेले विष ते नरेंद्र मोदींवर ओकत असल्याचा आरोप इराणी यांनी केला. मोदी यांची प्रतिमा खंडित करेल, असे वचन तुम्ही मासिकाच्या संपादकांना दिले होते. पंतप्रधानांचे बलस्थान हे देशातील नागरिक असल्याने ते वचन पूर्ण करण्यात तुम्हाला अपयश आले आहे, असे इराणी म्हणाल्या.