|
|
पंचांग Vrittabharati
मास : | वार : | तिथी :
नक्षत्र : | राशी :
करण : | योग :
सूर्योदय : 05:57 | सूर्यास्त : 18:48
अयनांश :
हवामान

किमान तापमान : 30.06° C

कमाल तापमान : 32.99° C

तापमान विवरण : few clouds

आद्रता : 62 %

वायू वेग : 5.06 Mps

स्थळ : Mumbai, IN

32.99° C

Weather Forecast for
Saturday, 11 May

27.75°C - 32.99°C

few clouds
Weather Forecast for
Sunday, 12 May

28.22°C - 30.34°C

broken clouds
Weather Forecast for
Monday, 13 May

28.13°C - 30.34°C

light rain
Weather Forecast for
Tuesday, 14 May

28.68°C - 30.75°C

light rain
Weather Forecast for
Wednesday, 15 May

28.59°C - 30.66°C

light rain
Weather Forecast for
Thursday, 16 May

28.57°C - 31.16°C

sky is clear
Home » राजकीय, राष्ट्रीय » राहुल गांधी स्वप्नातही सावरकर बनू शकत नाही: अनुराग ठाकूर

राहुल गांधी स्वप्नातही सावरकर बनू शकत नाही: अनुराग ठाकूर

नवी दिल्ली, (२७ मार्च) – राहुल गांधी जागेपणीच काय तर, त्यांना पडणार्या सर्वांत चांगल्या स्वप्नातही स्वातंत्र्यवीर सावरकर बनू शकत नाही. कारण, सावरकर होण्याकरिता मजबूत निर्धार आणि देशाविषयी प्रेम असावे लागते, असा जोरदार पलटवार भाजपाचे वरिष्ठ नेते आणि केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी सोमवारी केला.
मी सावरकर नाही. सावरकरांनी ब्रिटिशांची माफी मागितली होती, असा दावा राहुल गांधी यांनी वारंवार केला आहे. सोबतच, लंडनमध्ये मोदी सरकारविषयी जे काही बोललो, त्यासाठी मी कधीच माफी मागणार नाही, असे ते सातत्याने सांगत आहेत. यावरून अनुराग ठाकूर यांनी त्यांच्यावर हल्ला चढविला. ‘डीअर राहुल गांधी, जागेपणीच काय तर तुम्हाला पडणार्या सर्वोत्तम स्वप्नातही तुम्ही सावरकर बनू शकत नाही. कारण तुमच्यात ठाम निर्धार नाही, देशाविषयी प्रेम नाही आणि वचनबद्धता तर मुळीच नाही,’ असे ठाकूर यांनी ट्विटरवर स्पष्ट केले.
सावरकर वर्षातून सहा महिने कधीच विदेशात राहिले नव्हते आणि आपल्याच देशाविरोधात विदेशी शक्तींची मदतही मागितली नाही. सावरकरदेखील ब्रिटनला गेले होते, पण गुलामगिरीच्या विळख्यातून आपल्या भारत मातेला मुक्त करण्यासाठी चळवळ राबविण्याकरिता गेले होते. तुम्ही तर तिथे जाऊन आपल्याच मातृभूमीचा अपमान करीत असता. सावरकरांचा सातत्याने अपमान करता. मात्र, आता या देशातील जनताच तुम्हाला योग्य तो धडा शिकविणार आहे, असेही अनुराग ठाकूर यांनी सांगितले.
यावेळी ठाकूर यांनी तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी सावरकर यांच्या जन्मशताब्दीनिमित्त लिहिलेल्या पत्राचाही उल्लेख केला. वीर सावरकरांनी ब्रिटिशांच्या आदेशाची अवहेलना करण्याचे धाडस दाखविले. त्यांच्यासाठी स्वातंत्र्याचा लढाच सर्वकाही होता. यासाठी त्यांनी स्वत:च्या प्राणांचीही पर्वा केली नाही. भारत मातेचे ते खरे सुपुत्र होते, असे इंदिरा गांधी यांनी या पत्रात म्हटले होते, याकडे अनुराग ठाकूर यांनी लक्ष वेधले.

Posted by : | on : 27 Mar 2023
Filed under : राजकीय, राष्ट्रीय
Author Description : .
You can follow any responses to this entry through the RSS 2.0
You can leave a response or trackback to this entry

Related posts

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g