किमान तापमान : 30.48° C
कमाल तापमान : 32.99° C
तापमान विवरण : scattered clouds
आद्रता : 70 %
वायू वेग : 3.23 Mps
स्थळ : Mumbai, IN
32.99° C
28.78°C - 32.99°C
scattered clouds28.95°C - 32.13°C
few clouds28.77°C - 30.78°C
sky is clear29.01°C - 30.43°C
overcast clouds28.64°C - 30.45°C
broken clouds28.89°C - 30.42°C
light rainनवी दिल्ली, (१० सप्टेंबर) – जी-२० परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जगाला शांततेचा संदेश देत या ऐतिहासिक सोहळ्याची सांगता केली. मात्र, ही परिषद संपल्यावर काही मिनिटांतच भारताने चीनला मोठा संदेश दिला आहे. लडाखमधील न्योमा येथे भारत जगातील सर्वांत उंच लढाऊ एअरफिल्ड उभारणार आहे.
संरक्षण मंत्री राजनाथसिंह १२ आणि १३ सप्टेंबर रोजी जम्मूतील देवक सेतूवरून या प्रकल्पाची पायाभरणी करणार आहेत. प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर चीनसोबत सुरू असलेल्या तणावाच्या पृष्ठभूमीवर संरक्षण मंत्रालयाचा हा निर्णय अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे. पूर्व लडाखमधील महत्त्वाच्या न्योमा पट्ट्यात बॉर्डर रोड ऑर्गनायझेशनद्वारे नवीन एअरफिल्ड बांधण्यासाठी एकूण २१८ कोटी रुपये खर्च येणार आहे. सीमेवर चीनला कडवी टक्कर देण्यासाठी या एअरफिल्डचे बांधकाम अत्यंत महत्त्वाचे पाऊल मानले जात आहे.
पूर्व लडाखमधील न्योमा अॅडव्हान्स लॅण्डिंग ग्राऊंडचा वापर तीन वर्षांपूर्वीपासून केला जात आहे. चीनच्या सीमेवर सुरू असलेल्या तणावादरम्यान सैन्य आणि साहित्य वाहतूक करण्यासाठी याचा वापर केला जात आहे. २०२० मध्ये गलवानमध्ये भारत आणि चिनी लष्करात झालेल्या संघर्षानंतर दोन्ही देशांमध्ये अद्याप तणाव कायम आहे.