किमान तापमान : 28.68° C
कमाल तापमान : 28.89° C
तापमान विवरण : scattered clouds
आद्रता : 81 %
वायू वेग : 3.44 Mps
स्थळ : Mumbai, IN
28.89° C
28.44°C - 30.23°C
sky is clear27.95°C - 30.46°C
sky is clear27.64°C - 30.2°C
sky is clear27.48°C - 29.63°C
sky is clear27.57°C - 30.3°C
sky is clear27.89°C - 30.3°C
scattered clouds-ई-वाहनांचा वापर, पेपरलेस कार्यालय,
नवी दिल्ली, (२५ एप्रिल) – लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांनी सुरू केलेल्या ई-वाहनांचा वापर आणि पेपरलेस कार्यालय यासारख्या उपक्रमांद्वारे १७ व्या लोकसभेच्या चार वर्षांच्या कार्यकाळात विक्रमी ८०१.४६ कोटी रुपयांची बचत झाली, असे संसदेच्या एका अधिकार्याने मंगळवारी सांगितले.
मे २०१९ मध्ये १७ वी लोकसभा अस्तित्वात आल्यानंतर चार वर्षांत करण्यात आलेल्या अर्थसंकल्पीय तरतुदींपैकी जवळपास एक चतुर्थांश तरतूद जतन करण्यात आली आहे. लोकसभा सचिवालयाने २०२१-२२ या आर्थिक वर्षात २५८.४७ कोटी रुपये आणि २०२२-२३ मध्ये १३२.६० कोटी रुपयांची बचत केली. माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचा १३ महिन्यांचा कार्यकाळ असलेल्या १२ व्या लोकसभेला एकूण अर्थसंकल्पीय वाटपांपैकी ७.०१ कोटी रुपयांची बचत करण्यात यश आले. त्यांच्याच कार्यकाळातील १३व्या लोकसभेने (१९९९-२००४) पाच वर्षांच्या कालावधीत ९९.५२ कोटी रुपयांची बचत केली.
१४व्या लोकसभेत १४५.०७ कोटींची बचत झाली. १५ व्या लोकसभेने ९४.१७ कोटी रुपये तर १६व्या लोकसभेने ४६१ कोटी रुपयांची बचत केली. १७ व्या लोकसभेत विक्रमी बचतीचे कारण म्हणजे कोरोना महामारी आणि लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांनी आखून दिलेली कार्यप्रणाली. यामुळे लोकसभेचा खर्च कमी झाला आहे. लोकसभा कार्यालय पेपरलेस बनवणे आणि ई-वाहनांचा वापर यासारख्या अनेक उपक्रमांमुळे गेल्या चार वर्षांत इंधनाच्या खर्चात मोठी बचत झाली आहे.