|
|
पंचांग Vrittabharati
मास : | वार : | तिथी :
नक्षत्र : | राशी :
करण : | योग :
सूर्योदय : 05:54 | सूर्यास्त : 18:52
अयनांश :
हवामान

किमान तापमान : 28.3° C

कमाल तापमान : 30.09° C

तापमान विवरण : broken clouds

आद्रता : 81 %

वायू वेग : 2.74 Mps

स्थळ : Mumbai, IN

30.09° C

Weather Forecast for
Tuesday, 21 May

28.92°C - 30.99°C

overcast clouds
Weather Forecast for
Wednesday, 22 May

28.49°C - 30.83°C

scattered clouds
Weather Forecast for
Thursday, 23 May

28.55°C - 30.18°C

scattered clouds
Weather Forecast for
Friday, 24 May

28.48°C - 30.64°C

broken clouds
Weather Forecast for
Saturday, 25 May

28.45°C - 30.7°C

light rain
Weather Forecast for
Sunday, 26 May

28.88°C - 30.38°C

light rain
Home » राजकीय, राष्ट्रीय » विरोधकांचा आवाज दडपण्यासाठी यंत्रणांचा दुरुपयोग

विरोधकांचा आवाज दडपण्यासाठी यंत्रणांचा दुरुपयोग

– आठ विरोधी पक्षांचे पंतप्रधान मोदी यांना पत्र,
नवी दिल्ली, (५ मार्च) – विरोधी पक्षांच्या नेत्यांचा आवाज दडपण्यासाठी केंद्र सरकार ईडी आणि सीबीआयसारख्या संस्थांचा दुरुपयोग करीत असल्याचा आरोप आठ विरोधी पक्षांच्या नेत्यांनी रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठवलेल्या एका पत्रातून केला आहे. या पत्रावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, नॅशनल कॉन्फरन्सचे डॉ. फारुक अब्दुल्ला, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या नेत्या ममता बॅनर्जी, तेलंगणाचे मुख्यमंत्री आणि भारत राष्ट्र समितीचे चंद्रशेखर राव, दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आपचे सर्वेसर्वा अरविंद केजरीवाल, पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उत्तरप्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि समाजवादी पक्षाचे नेते अखिलेश यादव तसेच राजदचे तेजस्वी यादव यांच्या स्वाक्षर्या आहेत. काँग्रेसने मात्र या पत्रापासून आपल्याला दूर ठेवले. विशेष म्हणजे, विरोधी पक्षांच्या ऐक्यासाठी प्रयत्न करीत असलेले बिहारचे मुख्यमंत्री आणि जदयूचे नेते नितीशकुमार यांचीही या पत्रावर स्वाक्षरी नाही.
ईडी आणि सीबीआयसारख्या केंद्रीय यंत्रणांचा वापर आतापर्यंत विरोधी पक्षांतील अनेक नेत्याचा आवाज दडपण्यासाठी करण्यात आला, असा आरोप करीत या पत्रात याचे ताजे उदाहरण म्हणून दिल्लीचे माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्या अटकेचा उल्लेख करण्यात आला. राज्य सरकारांच्या कामकाजात राज्यपालांना अवाजवी हस्तक्षेप होत असून, यामुळे केंद्र आणि राज्यांमध्ये तणाव निर्माण झाला असल्याचा आरोपही या पत्रातून करण्यात आला आहे. पंतप्रधान मोदींना उद्देशून, भारत अजूनही लोकशाहीवादी देश असल्याचे आपण मान्य कराल; मात्र देशात सध्या विरोधी पक्षांच्या नेत्यांविरुद्ध ज्या पद्धतीने चौकशी यंत्रणांचा दुरुपयोग केला जात आहे, ते पाहता आपल्या देशाची वाटचाल हुकुमशाहीच्या दिशेने सुरू असल्यासारखे वाटते, असे या पत्रात म्हटले आहे.
२६ फेब्रुवारीला मनीष सिसोदिया यांना अटक करण्यात आली. त्यांच्याविरुद्ध लावण्यात आलेले सर्व आरोप निराधार आहे, हे एक प्रकारचे कारस्थान आहे, असा आरोप करीत पत्रात म्हटले की, त्यांच्या अटकेमुळे देशभरातील लोक नाराज आहे, त्यांच्या अटकेचा चुकीचा अर्थ निघत आहे. दिल्लीतील शाळांत सुधारणा करीत सिसोदिया यांनी आपली वेगळी ओळख देशात निर्माण केली. २०१४ नंतर देशात केंद्रीय चौकशी यंत्रणांनी जेवढ्या नेत्यांविरुद्ध कारवाई केली, त्यातील बहुतांश नेते विरोधी पक्षांतील. यातील ज्या नेत्यांनी नंतर भाजपात प्रवेश केला, त्यांच्याविरुद्धची चौकशी थांबवण्यात आली, अशा अनेक नेत्यांचा उल्लेख या पत्रात करण्यात आला.

Posted by : | on : 5 Mar 2023
Filed under : राजकीय, राष्ट्रीय
Author Description : .
You can follow any responses to this entry through the RSS 2.0
You can leave a response or trackback to this entry

Related posts

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g