किमान तापमान : 29.14° C
कमाल तापमान : 29.99° C
तापमान विवरण : scattered clouds
आद्रता : 74 %
वायू वेग : 4 Mps
स्थळ : Mumbai, IN
29.99° C
28.51°C - 30.09°C
sky is clear28.68°C - 30.58°C
overcast clouds28.84°C - 30.35°C
light rain29.07°C - 30.55°C
sky is clear28.09°C - 31.06°C
light rain28.76°C - 30.76°C
sky is clear– संरक्षण राज्यमंत्री जनरल सिंह यांचा विश्वास,
नवी दिल्ली, (३० सप्टेंबर) – व्याप्त काश्मीर आपणहूनच भारतात येईल, या दाव्याचा भूपृष्ठ परिवहन आणि महामार्ग राज्यमंत्री जनरल व्ही. के. सिंह यांनी पुनरुच्चार केला. व्याप्त काश्मीरमधील जनता वाढती महागाई, अन्नधान्याची टंचाई तसेच विजेच्या तुटवड्यामुळे त्रस्त आहे. पाकिस्तान सरकारविरुद्ध त्यांनी निदर्शनेही केली होती. तेथील जनतेने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना या संकटातून आपली कायमस्वरूपी सुटका करण्याचे साकडेही घातले आहे.
त्यामुळे व्याप्त काश्मीर भारतात विलीन करण्यासाठी आपल्याला फारसे प्रयत्न करावे लागणार नाही. ते आपणहून भारतात येईल, असा माझा विश्वास असल्याचे ते म्हणाले. पाकिस्तानातील सध्याची जी स्थिती आहे, तेथील राज्यकर्ते आपसातच भांडत आहे. जनतेच्या समस्यांकडे कोणाचे लक्ष नाही, त्यामुळे व्याप्त काश्मिरातीलच नाही तर, पाकिस्तानातील जनताही या सगळ्या गोष्टींना कंटाळली आहे. त्यामुळेच व्याप्त काश्मीर आपणहून भारताकडे आले तर, मला आश्चर्य वाटणार नाही, असे सिंह म्हणाले. जनरल सिंह यांनी काही दिवसांपूर्वी गोरखपूरमध्येही याच आशयाचे विधान केले होते.