किमान तापमान : 27.8° C
कमाल तापमान : 27.8° C
तापमान विवरण : clear sky
आद्रता : 67 %
वायू वेग : 3.13 Mps
स्थळ : Mumbai, IN
27.8° C
27.76°C - 29.98°C
sky is clear28.18°C - 30.34°C
sky is clear28.4°C - 29.79°C
scattered clouds28.05°C - 29.41°C
sky is clear27.88°C - 29.23°C
sky is clear27.83°C - 29.24°C
light rainम्हणाले, आपण चंद्राचे मालक आहोत का?,
नवी दिल्ली, (२७ ऑगस्ट) – भारताच्या चांद्रयान-३ ने चंद्राच्या दक्षिण ध‘ुवावर लॅण्डिंग केले आणि जगभरातील समस्त भारतीयांनी आनंद साजरा केला. ज्यांना काही कळत नव्हते, त्यांनीही जल्लोष केला. मात्र, काँग‘ेस नेते रशीद अल्वी यांनी लॅण्डिंग पॉईंटला ‘शिवशक्ती’ हे नाव देण्यावरून थयथयाट केला आहे. ग‘ीस दौर्यावरून परतल्यानंतर पंतप्रधान मोदी यांनी शनिवारी बंगळुरूमध्ये इस्रोच्या वैज्ञानिकांची भेट घेतली आणि त्यांचे अभिनंदन केले. यावेळी शास्त्रज्ञांना संबोधित करताना पंतप्रधान मोदींनी काही महत्त्वाच्या घोषणाही केल्या. चांद्रयान-३ चे विक‘म लॅण्डर ज्या चंद्राच्या पृष्ठभागावर उतरले, त्या जागेचे नाव ‘शिवशक्ती’ असेल, असे पंतप्रधान म्हणाले. पंतप्रधान मोदींच्या या घोषणेमुळे काँग‘ेस नेते रशीद अल्वी मात्र चांगलेच संतापले. ते म्हणाले की, आम्ही ज्या लॅण्डिंग पॉईंटला नाव देतो, त्याचे आम्ही मालक नाही.
एका वृत्तवाहिनीशी बोलताना रशीद अल्वी म्हणाले, नरेंद्र मोदींना चंद्राच्या पृष्ठभागाचे नाव देण्याचा अधिकार कोणी दिला? या नामकरणानंतर संपूर्ण जग आपल्यावर हसेल. चंद्राच्या त्या ठिकाणी लॅण्डिंग झाले आहे, ही खूप चांगली गोष्ट आहे आणि आम्हाला याचा अभिमान आहे. मात्र, चंद्र आमच्या मालकीचा नाही. सत्तेत आल्यापासून नाव बदलण्याची भाजपाची सवय असल्याचे त्यांनी सांगितले. जेव्हा त्यांना विचारण्यात आले की, चांद्रयान-१ ज्या जागेवर उतरले, त्या जागेचे नाव संपुआ सरकारच्या काळात जवाहर पॉईंट होते, परंतु भाजपा म्हणत आहे की, पंतप्रधानांनी या लॅण्डिंग पॉईंटचे नाव अटलबिहारी वाजपेयी ठेवले नाही, सरकारने त्याचे नाव जवाहर पॉईंट ठेवले आहे. यावर उत्तर देताना रशीद अल्वी म्हणाले, तुम्ही जवाहरलाल नेहरूंशी तुलना करू शकत नाही. आज जो काही इस्रो आहे, तो जवाहरलाल नेहरूंमुळेच, हे सांगण्यास ते विसरले नाहीत.
भाजपाचा हल्लाबोल
रशीद अल्वी यांच्या वक्तव्यावरून भाजपाने जोरदार हल्ला चढविला. पंतप्रधान मोदी यांच्यासाठी देश प्रथम, तर काँग‘ेससाठी कुटुंब प्रथम आहे. भाजपाचे प्रवक्ते शहजाद पूनावाला म्हणाले की, संपुआ सरकार असते तर, गांधी घराण्याचे नाव दिले असते आणि त्यांनी चंद्रावर इंदिरा पॉईंट आणि राजीव पॉईंटची नावे जाहीर केली असती. काँग‘ेस सरकारने चांद्रयान-१ जेथे उतरले, त्या ठिकाणाचे नाव जवाहर पॉईंट असे ठेवले आहे.