किमान तापमान : 28.01° C
कमाल तापमान : 28.66° C
तापमान विवरण : scattered clouds
आद्रता : 80 %
वायू वेग : 2.08 Mps
स्थळ : Mumbai, IN
28.66° C
28.23°C - 29.79°C
sky is clear27.79°C - 29.73°C
sky is clear27.68°C - 29.18°C
sky is clear27.67°C - 29.77°C
sky is clear27.87°C - 29.15°C
sky is clear28.2°C - 29.53°C
overcast clouds– नौदलासाठी बांधणार पाच जहाजे,
नवी दिल्ली, (२५ ऑगस्ट) – भारतीय नौदलासाठी पाच नवीन जहाजांची बांधणी करण्याकरिता संरक्षण मंत्रालयाने शुक्रवारी हिंदुस्थान शिपयार्ड लि.सोबत १९ हजार कोटी रुपयांचा करार केला. या जहाजांचे वजन ४४ हजार टन इतके राहणार असून, भारतातच आणि भारतीय कंपनीच्या माध्यमातून बांधण्यात येणारे अशा प्रकारचे हे पहिलेच जहाज असणार आहे. या जहाजांमुळे भारतीय नौदलाला मोठे पाठबळ मिळणार आहे. देशाला संरक्षण क्षेत्रात आत्मनिर्भर बनविण्याच्या दिशेने उचलण्यात आलेले हे अतिशय महत्त्वाचे पाऊल ठरणार आहे. हिंदुस्थान शिपयार्ड लि. या जहाजांची बांधणी विशाखापट्टणम् येथे करणार असल्याची माहिती संरक्षण मंत्रालयाच्या अधिकार्यांनी दिली.
सुरक्षेवरील कॅबिनेट समितीने या कराराला १६ ऑगस्ट रोजी मंजुरी दिली होती. त्यानंतर आज संरक्षण मंत्रालय आणि हिंदुस्थान शिपयार्ड लि. यांच्यात करारांवर स्वाक्षरी करण्यात आली. देशातच या जहाजांचे प्रारूप तयार करण्यात येणार असून, हा व्यवहार १९ हजार कोटी रुपयांचा असणार आहे, असे अधिकार्यांनी सांगितले. समुद्रात एका जहाजाची जागा कालांतराने दुसरे जहाज घेत असते. हीच प्रथा आहे. याच उद्देशाने या अतिरिक्त जहाजांची बांधणी करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. या जहाजांमध्ये इंधन, पाणी, शस्त्रसाठा व दारुगोळा आणि इतर सर्व अत्यावश्यक वस्तू उपलब्ध असतील. कोणत्याही गोष्टीसाठी बंदरावर परत जाण्यासाठी नौदलाला लागणार्या प्रदीर्घ वेळेची बचत या जहाजांमुळे होणार आहे.
नौदलाची क्षमता वाढणार
सध्या जी जहाजे समुद्रात तैनात आहेत, त्यांच्यासाठी ही जहाजे सहायकाची भूमिका पार पाडणार आहेत. यामुळे भारतीय नौदलाच्या क्षमतेत कितीतरी पटीने वाढ होणार आहे. नैसर्गिक संकटांच्या काळात मानवी मदतीकरिताही या जहाजांचा वापर केला जाणार आहे.
रोजगाराच्या संधीही वाढणार
या प्रकल्पामुळे पुढील आठ वर्षांच्या काळात रोजगाराच्या मोठ्या प्रमाणात संधी उपलब्ध होणार आहे, असे संरक्षण मंत्रालयाने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे.