किमान तापमान : 29.18° C
कमाल तापमान : 30.39° C
तापमान विवरण : clear sky
आद्रता : 68 %
वायू वेग : 5.26 Mps
स्थळ : Mumbai, IN
30.39° C
29.94°C - 32.03°C
sky is clear28.92°C - 31.92°C
sky is clear28.75°C - 31.38°C
sky is clear28.1°C - 29.72°C
few clouds27.91°C - 29.21°C
sky is clear27.73°C - 29.38°C
sky is clearनवी दिल्ली, (२४ मे) – नव्या संसदभवनाच्या उद्घाटन समारंभावर बहिष्कार घालण्याची घोषणा देशातील १९ विरोधी पक्षांनी केली असताना, सहा राजकीय पक्षांनी या समारंभात सहभागी होण्याचा निर्णय घेतल्यामुळे सरकारला मोठा दिलासा मिळाला आहे. तेलुगू देसम, वायएसआर काँग्रेस, बिजू जनता दल, अण्णाद्रमुक, बसपा, तसेच शिरोमणी अकाली दलाने या कार्यक्रमात सहभागी होण्याची घोषणा केली. हे सर्व पक्ष कधीकाळी भाजपाच्या नेतृत्वातील राष्ट्रीय लोकशाही आघाडीतही होते. तेलंगणाचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांच्या भारत राष्ट्र समिती या पक्षाची भूमिका समजू शकली नाही.
२८ मे ला संसदभवनाच्या नव्या इमारतीचे लोकार्पण पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते होत आहे. याला विरोधी पक्षांचा विरोध आहे. नव्या संसदभवनाचे उदघाटन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते करावे, अशी काँग्रेस आणि अन्य विरोधी पक्षांची मागणी आहे. तेलुगू देसम पक्ष या समारंभाला उपस्थित राहणार असल्याची घोषणा या पक्षाचे खासदार विजयसाई रेड्डी यांनी केली.
देशातील सर्व राज्यांच्या तसेच केंद्रशासित प्रदेशांच्या मुख्यमंत्र्यानांही या समारंभाचे निमंत्रण देण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे संसदेच्या दोन्ही सभागृहांच्या खासदारांना या समारंभासाठी आमंत्रित केले जाणार आहे. ‘यातनाम उद्योगपती रतन टाटा तसेच आर्किटेक्ट बिमल पटेल यांनाही या समारंभासाठी आमंत्रित करण्यात आले आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू तसेच उपराष्ट्रपती जगदीप धनकड या समारंभासाठी शुभेच्छा संदेश पाठवणार आहेत. नव्या संसद भवनाच्या उद्घाटन समारंभावर बहिष्कार घालून विरोधी पक्षांनी याचे राजकारण करू नये, असे आवाहन गृहमंत्री अमित शाह यांनी केले. नव्या संसदभवनाचा शिलान्यास पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते २०२० मध्ये झाला होता.