किमान तापमान : 27.87° C
कमाल तापमान : 28.62° C
तापमान विवरण : scattered clouds
आद्रता : 77 %
वायू वेग : 2.56 Mps
स्थळ : Mumbai, IN
28.62° C
28.31°C - 30.25°C
sky is clear28.41°C - 30.41°C
scattered clouds28.44°C - 30.73°C
broken clouds28.49°C - 31.26°C
sky is clear28.25°C - 30.8°C
light rain28.81°C - 31.42°C
sky is clearनवी दिल्ली, (२७ मार्च) – अदानी समूहाच्या आर्थिक व्यवहाराची संयुक्त सांसदीय समितीमार्फत (जेपीसी) चौकशी करावी, या मागणीसाठी तसेच राहुल गांधींचे सदस्यत्व रद्द केल्याच्या मुद्यावरुन काँग्रेस आणि अन्य विरोधी पक्षांनी आज संसदभवन परिसरातील महात्मा गांधी यांच्या पुतळ्यासमोर धरणे दिले, तसेच मोर्चाही काढला.
सरकारचा निषेध करण्यासाठी काँग्रेसचे सदस्य आज काळेवस्त्र परिधान करुन संसदभवन परिसरात आले होते. संसदेच्या दोन्ही सभागृहांचे कामकाज स्थगित होताच काँग्रेस आणि अन्य विरोधी पक्षांच्या सदस्यांनी महात्मा गांधींच्या पुतळ्यासमोर धरणे देत निदर्शने केली. या धरणे आंदोलनात राज्यसभेतील विरोधी पक्षनेते तसेच काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खडगे, माजी अध्यक्ष श्रीमती सोनिया गांधी आणि अन्य पक्षांचे नेतेही सहभागी झाले होते. सोनिया गांधी काळी साडी घालून होत्या, खडगे यांनी तर काळ्या कपड्यासोबत काळा फेटाही घातला होता. यावेळी सदस्यांच्या हातात विविध घोषणांचे पोस्टर्सही होते.
ईडी आणि अन्य सरकारी यंत्रणाचा सरकार विरोधकांविरुध्द दुरुपयोग करत असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. नंतर विरोधकांनी संसदभवन परिसरातून विजय चौकापर्यंत मोर्चाही काढला. यावेळी विरोधी सदस्यांच्या हातात घोषणांचे पोस्टर्स होते. सत्यमेव जयते, असा मजकूर असलेला एक मोठा बॅनरही विरोधी सदस्यांच्या हातात होता. संसदेचे कामकाज सुरु होण्यापूर्वी आज सकाळी विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खडगे यांच्या संसदभवनातील कार्यालयात संसदेतील कामकाजाबाबत व्यूहरचना ठरवण्यासाठी विरोधी पक्षांची बैठक झाली. या बैठकीत आप, द्रमुक, राजद, माकप, भाकप, जदयु, आरएसपी, शिवसेना, तृणमूल काँग्रेस, समाजवादी पक्ष, नॅशनल कॉन्फरन्स आदी पक्षांचे नेते सहभागी झाले होते. आतापर्यंत काँग्रेसपासून दूर असलेली तृणमूल काँग्रेसही आज या मोर्चात सहभागी झाली होती.