किमान तापमान : 28.91° C
कमाल तापमान : 29.99° C
तापमान विवरण : few clouds
आद्रता : 84 %
वायू वेग : 3.81 Mps
स्थळ : Mumbai, IN
29.99° C
27.32°C - 30.2°C
sky is clear27.94°C - 31.58°C
sky is clear28.2°C - 30.44°C
sky is clear27.88°C - 30.21°C
few clouds27.63°C - 29.87°C
sky is clear27.53°C - 29.77°C
sky is clearराजनाथसिंह यांची माहिती,
नवी दिल्ली, ४ डिसेंबर – मागील सात वर्षांत भारताने ३८ हजार कोटींपेक्षा जास्त रुपयांच्या संरक्षण उपकरणांची निर्यात केली असून, देश लवकरच संरक्षण क्षेत्रातील मोठा निर्यातदार होईल, असा विश्वास संरक्षणमंत्री राजनाथसिंह यांनी व्यक्त केला.
एअरोस्पेस आणि संरक्षण क्षेत्राचा देशातील उद्योग ८५ हजार कोटी रुपयांचा असल्याचा अंदाज आहे. यात खाजगी क्षेत्राचे योगदान वाढून आता १८ हजार कोटी रुपयांचे झाले आहे, असे राजनाथसिंह यांनी सोसायटी ऑफ इंडियन डिफेन्स मॅन्युफॅक्चरर्सने मध्यम, सूक्ष्म व लघु उद्योजकांवरील (एमएसएमई) परिषदेला संबोधित करताना सांगितले. देशाच्या सुरक्षेसाठी मदत होईल, यासाठी एमएसएमई क्षेत्राने संशोधन आणि विकासात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करावी, असे आवाहन राजनाथसिंह यांनी केले. एमएसएमई क्षेत्राने नवीन तंत्रज्ञान, नवीन उत्पादने आणावी. लहान असल्याने आपण नाविन्यपूर्ण संशोधन करू शकणार नाही, असा विचार करू नका, असे त्यांनी सांगितले. केंद्र सरकारने पुढाकार घेतल्याने देशभरातील जवळपास १२ हजार एमएसएमई उद्योजक संरक्षण उद्योगात सहभागी झाले आहेत. केंद्राच्याच पुढाकारामुळे मागील सात वर्षांत ३८ हजार कोटींपेक्षा जास्त रुपयांची संरक्षण उपकरणांची निर्यात करण्यात आली, असे राजनाथसिंह यांनी सांगितले.