|
|
पंचांग Vrittabharati
मास : | वार : | तिथी :
नक्षत्र : | राशी :
करण : | योग :
सूर्योदय : 05:54 | सूर्यास्त : 18:51
अयनांश :
हवामान

किमान तापमान : 30.23° C

कमाल तापमान : 31.4° C

तापमान विवरण : scattered clouds

आद्रता : 77 %

वायू वेग : 1.77 Mps

स्थळ : Mumbai, IN

31.4° C

Weather Forecast for
Sunday, 19 May

29.12°C - 31.99°C

sky is clear
Weather Forecast for
Monday, 20 May

28.81°C - 31.87°C

sky is clear
Weather Forecast for
Tuesday, 21 May

28.58°C - 31.35°C

few clouds
Weather Forecast for
Wednesday, 22 May

28.47°C - 30.26°C

few clouds
Weather Forecast for
Thursday, 23 May

28.66°C - 30.17°C

broken clouds
Weather Forecast for
Friday, 24 May

28.35°C - 29.99°C

broken clouds
Home » अर्थ, राष्ट्रीय » सीतारामन् जाहीर करणार आणखी एक पॅकेज

सीतारामन् जाहीर करणार आणखी एक पॅकेज

आर्थिक व्यवहारविषयक सचिवाची माहिती,
नवी दिल्ली, ३ नोव्हेंबर – कोरोना महामारीमुळे फटका बसलेली अर्थव्यवस्थेला वेग देण्यासाठी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन् लवकरच आणखी एक प्रोत्साहन पॅकेज जाहीर करणार आहेत, अशी माहिती आर्थिक व्यवहारविषयक विभागाचे सचिव तरुण बजाज यांनी आज मंगळवारी दिली. अर्थव्यवस्थेतील विविध क्षेत्रांकडून आलेल्या सूचना आणि विनंत्यांचे परीक्षण सध्या अर्थमंत्रालयाकडून केले जात आहे, असे त्यांनी आभासी स्वरूपात झालेल्या एका पत्रकार परिषदेत सांगितले.
आणखी एक प्रोत्साहन पॅकेज जाहीर करण्याबाबत सध्या आम्ही चर्चा करीत आहोत. अर्थव्यवस्थेतील विविध क्षेत्रांकडून आम्हाला मोठ्या प्रमाणात सूचना आणि विनंत्या प्राप्त झाल्या आहेत. सध्या आम्ही त्याचे परीक्षण करीत असून, लवकरच याबाबत घोषणा केली जाईल. या मुद्यावर सीतारामन् तुमच्यासोबत चर्चा करतील, असे त्यांनी सांगितले.
मागणी तसेच भांडवली खर्चात वाढ व्हावी यासाठी केंद्रीय अर्थमंत्र्यांनी मागील महिन्यात काही उपाययोजना जाहीर केल्या होत्या. कोरोना महामारीचा देशात उद्रेक झाल्यापासून हे तिसरे प्रोत्साहन पॅकेज होते. कोरोना महामारीचा फटका बसलेल्या गरीब आणि असुरक्षित क्षेत्रासाठी केंद्र सरकारने पंतप्रधान गरीब योजनेंतर्गत १.७० लाख कोटी रुपयांचे पॅकेज मार्च महिन्यात जाहीर केले होते.
त्यानंतर २०.९७ लाख कोटी रुपयांचे आत्मनिर्भर भारत पॅकेज मे महिन्यात घोषित करण्यात आले. या पॅकेजमध्ये पुरवठा उपाययोजना आणि दीर्घकालीन सुधारणांवर लक्ष केंद्रित करण्यात आले होते. खाद्यान्नाच्या वाढत्या किमती हा अस्थायी घटक आहे आणि या किमती कमी करण्यासाठी केंद्र सरकारने काही उपाययोजना केल्या आहेत, असे बजाज यांनी सांगितले.

Posted by : | on : 4 Nov 2020
Filed under : अर्थ, राष्ट्रीय
Author Description : .
You can follow any responses to this entry through the RSS 2.0
You can leave a response or trackback to this entry

Related posts

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g