किमान तापमान : 27.87° C
कमाल तापमान : 27.99° C
तापमान विवरण : scattered clouds
आद्रता : 83 %
वायू वेग : 2.56 Mps
स्थळ : Mumbai, IN
27.99° C
27.96°C - 30.25°C
sky is clear28.41°C - 30.41°C
scattered clouds28.44°C - 30.73°C
broken clouds28.49°C - 31.26°C
sky is clear28.25°C - 30.8°C
light rain28.81°C - 31.42°C
sky is clearअदानी प्रकरणी जेपीसीच हवी : काँग्रेस,
नवी दिल्ली, (२२ मार्च) – अदानी प्रकरणातील सत्य समोर आणण्यासाठी संयुक्त संसदीय समिती अर्थात् जेपीसी हाच एकमेव मार्ग आहे. सर्वोच्च न्यायालयाने तपासासाठी जे पॅनेल नियुक्त केले आहे, ते क्लिन चीट पॅनेल आहे, असा दावा काँग्रेसने बुधवारी केला. या प्रकरणी जेपीसी चौकशीच व्हायला हवी, या मागणीवर विरोधक ठाम आहेत. सरकारला मात्र जेपीसी मान्य नाही. आमची ही मागणी दाबण्यासाठी सत्ताधार्यांनी राहुल गांधी यांच्या लंडनमधील वक्तव्याला ढाल बनविले आहे. राहुल यांनी माफी मागावी, या मागणीवर ते अडून बसले आहेत, असे काँग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश यांनी पक्षाच्या मुख्यालयात आयोजित पत्रपरिषदेत सांगितले.
राहुल गांधी यांनी माफी मागण्याचा प्रश्नच उद्भवत नाही तसेच जेपीसीच्या मागणीवरूनही आम्ही मागे हटणार नाही. आम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना अदानी प्रकरणी ‘हम अदानी के हैं कौन’ या संदर्भात ५ फेब्रुवारीपासून ९९ प्रश्न विचारले आहेत. आमच्या या मोहिमेला शंभर गुण मिळाले आहेत. आज आम्ही त्यांना राष्ट्रीय मुद्यावर शेवटचा प्रश्न विचारला आहे, असे जयराम रमेश म्हणाले. सर्वोच्च न्यायालयाने अदानी प्रकरणाच्या चौकशीसाठी २ मार्च रोजी तज्ज्ञांची समिती गठित केली. मात्र, या समितीला काहीच अर्थ नाही. कारण, ती केवळ क्लिन चीट समिती आहे, असा आरोप रमेश यांनी केला.