किमान तापमान : 30.23° C
कमाल तापमान : 30.23° C
तापमान विवरण : clear sky
आद्रता : 59 %
वायू वेग : 4.02 Mps
स्थळ : Mumbai, IN
30.23° C
27.39°C - 30.57°C
sky is clear28.14°C - 31.11°C
sky is clear28.47°C - 30.63°C
scattered clouds28.04°C - 30.14°C
sky is clear27.8°C - 30.07°C
sky is clear28.08°C - 30.2°C
sky is clear– राज्यवर्धनसिंह राठोड यांची मागणी,
नवी दिल्ली, (११ ऑगस्ट) – भाजपा खासदार कर्नल राज्यवर्धनसिंह राठोड यांनी गुरुवारी संसदेच्या अधिवेशनात लोकसभेत विचार व्यक्त केले. यावेळी त्यांनी सोनिया आणि राहुल गांधींवर जबरदस्त हल्ला चढवला. एवढेच नव्हे तर, राज्यवर्धनसिंह राठोड यांनी सोनिया आणि राहुल गांधी यांच्यावर देशद्रोहाचा खटला चालवण्याची मागणीही केली. मी बीजिंग ऑलिम्पिकमध्ये इतर खेळाडूंसह सहभागी झालो असताना काँग्रेसच्या नेत्या सोनिया आणि राहुल गांधी चीनच्या कम्युनिस्ट पक्षाच्या नेत्यांच्या भेटीत व्यस्त होते, असा आरोप राज्यवर्धनसिंह राठोड यांनी केला.
राज्यवर्धनसिंह राठोड म्हणाले, मी चीनमध्ये २००८ मध्ये बीजिंग ऑलिम्पिकमध्ये होतो. सोनिया आणि राहुल गांधी आम्हाला भेटायला येत आहेत, हे आम्हाला सांगण्यात आले. पण, प्रत्यक्षात ते आम्हाला भेटायला आले नाहीत आणि आम्हाला भेटलेही नाहीत. त्यांच्या भोजनाच्या थाळ्या चीनच्या कम्युनिस्ट पक्षाकडून दिल्या जात होत्या. त्यांनी चीनच्या कम्युनिस्ट पक्षाच्या नेत्यांची भेट घेतली. ते रिमोट कंट्रोलवर सरकार चालवत असत. एखाद्या सैनिकाने असा काही प्रयत्न केला असता तर, त्यांच्यावर देशद्रोहाचा खटला भरण्यात येतो. सोनिया आणि राहुल गांधी त्यावेळी सरकार चालवत होते. त्यामुळे त्यांच्यावर देशद्रोहाचा खटला दाखल करण्यात आला पाहिजे, अशी मागणी राठोड यांनी केली.
काँग्रेसला लाज वाटली पाहिजे!
राज्यवर्धनसिंह राठोड यांनी आपल्या भाषणात काँग्रेसच्या गहलोत सरकारलाही घेरले. ते म्हणाले, काँग्रेसला लाज वाटली पाहिजे. बहिणींची आणि मुलींची माफी मागा. त्या बापाच्या वेदना अनुभवा, ज्याच्या मुलीवर बलात्कार झाला, गोळी झाडली, अॅॅसिड टाकून विहिरीत फेकण्यात आले. गहलोत यांच्या कुशासनामुळे राजस्थान हा माणसांचा नाही, तर मृतांचा देश बनला आहे, असा घणाघात त्यांनी केला.