|
|
पंचांग Vrittabharati
मास : | वार : | तिथी :
नक्षत्र : | राशी :
करण : | योग :
सूर्योदय : 06:02 | सूर्यास्त : 18:44
अयनांश :
हवामान

किमान तापमान : 30.31° C

कमाल तापमान : 32.99° C

तापमान विवरण : clear sky

आद्रता : 46 %

वायू वेग : 6.54 Mps

स्थळ : Mumbai, IN

32.99° C

Weather Forecast for
Monday, 29 Apr

29.18°C - 32.99°C

sky is clear
Weather Forecast for
Tuesday, 30 Apr

29.15°C - 32.46°C

sky is clear
Weather Forecast for
Wednesday, 01 May

28.48°C - 32.12°C

sky is clear
Weather Forecast for
Thursday, 02 May

27.63°C - 30.85°C

sky is clear
Weather Forecast for
Friday, 03 May

27.53°C - 30.43°C

sky is clear
Weather Forecast for
Saturday, 04 May

27.47°C - 30.35°C

sky is clear
Home » राजकीय, राष्ट्रीय » हा न्यायपालिकेवर दबाव आणण्याचा प्रयत्न : भाजपा

हा न्यायपालिकेवर दबाव आणण्याचा प्रयत्न : भाजपा

नवी दिल्ली, (०३ एप्रिल) – आव्हान याचिका दाखल करण्याच्या नावावर सूरतमध्ये शक्तिप्रदर्शन करण्याच्या काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या प्रकारावर भाजपाने जोरदार हल्ला चढवला. काँग्रेसचा हा न्यायपालिकेवर दबाव आणण्याचा प्रयत्न आहे का, अशी विचारणा भाजपा प्रवक्ते डॉ. संबित पात्रा यांनी केली आहे. राहुल गांधी, आपले कुटुंबीय, मुख्यमंत्रीद्वय अशोक गहलोत आणि भूपेश बघेल यांच्यासोबत सू?रतला गेले. दोन वर्षांच्या शिक्षेला आव्हान देण्याच्या नावाखाली देशात अराजक निर्माण करण्याचा त्यांचा हा प्रयत्न असल्याचा आरोप पात्रा यांनी केला.
ओबीसी समाजातील लोकांबद्दल जातीवाचक उद्गार काढल्याबद्दल तसेच या समाजातील लोकांचा अपमान केल्यामुळे राहुल गांधींना न्यायालयाने तुरुंगवासाची शिक्षा सुनावली. त्यामुळे त्यांना खासदारकी गमवावी लागली. संपुआ सरकारच्या काळात करण्यात आलेल्या कायद्यामुळेच राहुल गांधींवर ही कारवाई झाली. आता हे सर्व या शिक्षेला आव्हान देण्यासाठी सूरतला गोंधळ घालण्यासाठी गेले. या गोंधळाची खरोखरच गरज होती का. ही तर तुमची नौटंकी आहे, असा टोला पात्रा यांनी लगावला.
निव्वळ नाटक : किरेन रिजिजू
नेते आणि कार्यकर्त्यांना घेऊन सूरतला जाण्याची राहुल गांधी यांची कृती ही नाटक असल्याचा आरोप केंद्रीय विधि आणि न्याय मंत्री किरेन रिजिजू यांनी एका ट्विटमधून केला. काँग्रेस अशा अनुचित पद्धतीने न्यायपालिकेवर दबाव आणण्याचा प्रयत्न का करीत आहे, असा प्रश्न उपस्थित करून रिजिजू म्हणाले की, न्यायिक प्रकरणांना सामोरी जाण्याची एक पद्धत असते, पण काँग्रेसची ही कोणती पद्धत आहे. याआधी अशी एखादी घटना घडली होती का, जेव्हा एखाद्या राजकीय पक्षाने न्यायपालिकेलाच घेराव घालण्याचा प्रयत्न केला. काँग्रेस फक्त राहुल गांधींसाठी ही सारी नौटंकी करीत आहे. काँग्रेस पक्ष एका व्यक्तीला, एका घरण्याला देशापेक्षा आणि देशातील कायद्यापेक्षा वर मानते.

Posted by : | on : 3 Apr 2023
Filed under : राजकीय, राष्ट्रीय
Author Description : .
You can follow any responses to this entry through the RSS 2.0
You can leave a response or trackback to this entry

Related posts

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g