|
|
पंचांग Vrittabharati
मास : | वार : | तिथी :
नक्षत्र : | राशी :
करण : | योग :
सूर्योदय : 06:03 | सूर्यास्त : 18:44
अयनांश :
हवामान

किमान तापमान : 31.01° C

कमाल तापमान : 34.99° C

तापमान विवरण : few clouds

आद्रता : 28 %

वायू वेग : 5.69 Mps

स्थळ : Mumbai, IN

34.99° C

Weather Forecast for
Saturday, 27 Apr

28.08°C - 34.99°C

few clouds
Weather Forecast for
Sunday, 28 Apr

28.38°C - 31.29°C

sky is clear
Weather Forecast for
Monday, 29 Apr

28.82°C - 32.87°C

sky is clear
Weather Forecast for
Tuesday, 30 Apr

29.01°C - 32.87°C

sky is clear
Weather Forecast for
Wednesday, 01 May

28.9°C - 32.28°C

sky is clear
Weather Forecast for
Thursday, 02 May

28.21°C - 30.5°C

sky is clear
Home » ठळक बातम्या, महाराष्ट्र » एमएच-सीईटी ५ मे रोजीच होणार

एमएच-सीईटी ५ मे रोजीच होणार

=विनोद तावडे यांचे स्पष्टीकरण=
vinod-tawde2मुंबई, [२९ एप्रिल] – राज्य सरकारतर्फे घेण्यात येणारी महाराष्ट्राची एमएच-सीईटी ही परीक्षा ५ मे २०१६ रोजी ठरलेल्या वेळापत्रकानुसार घेतली जाणार आहे. या परीक्षेच्या तारखेमध्ये कोणताही बदल होणार नाही. ज्या विद्यार्थ्यांनी या परीक्षेची तयारी केली आहे, त्या विद्यार्थ्यांनी गोंधळून न जाता पूर्ण तयारीनिशी ही परीक्षा द्यावी, असे आवाहन वैद्यकीय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी शुक्रवारी एका पत्रकार परिषदेत केले.
विविध वैद्यकीय अभ्यासक्रमांसाठी केंद्रीय पातळीवरील ‘नीट’ परीक्षा याच शैक्षणिक वर्षापासून घेण्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला. ‘नीट’ यंदापासून लागू करायची असल्याने पहिल्या टप्प्यात १ मे रोजी आणि दुसर्‍या टप्प्यात २४ जुलै रोजी परीक्षा घेण्यात येणार आहे, असेही न्यायालयाने आपल्या निकालात स्पष्ट केले आहे. यासंदर्भात विद्यार्थ्यांमध्ये निर्माण झालेला गोंधळ दूर करण्यासाठी तावडे यांनी एमएच-सीईटी परीक्षेसंदर्भात पत्रकार परिषद घेतली. यावेळी आमदार आशीष शेलार, वैद्यकीय संचालक डॉ. प्रवीण शिनगारे उपस्थित होते.
तावडे म्हणाले की, सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या ‘नीट’ परीक्षेच्या निकालावरून विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांमध्ये गोंधळाचे वातावरण निर्माण झाल्याचे चित्र आहे. मात्र, विद्यार्थ्यांनी कोणतेही दडपण न घेता ५ मे २०१६ रोजी होणारी एमएच-सीईटी परीक्षा द्यावी, असे आवाहन मी या निमित्ताने करीत आहे. राज्य सरकारच्या वतीने येत्या सोमवारी सर्वोच्च न्यायालयात फेरविचार याचिका दाखल करण्यात येणार आहे. त्यासाठी महाराष्ट्रातून दोन अधिकारी नवी दिल्ली येथे पोचले आहेत. तसेच सदर फेरविचार याचिकेवर राज्य सरकारची बाजू मांडण्यासाठी विशेष वकिलांची मदत घेण्यात येत आहे, अशी माहिती तावडे यांनी दिली.
फेरविचार याचिकेतील महत्त्वाचे मुद्दे
१. शासकीय आणि खाजगी वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेशासाठी एकच सीईटी असावी, असा कायदा पारित केला असल्याने महाराष्ट्रात खेडोपाडी आणि गरीब असणार्‍या विद्यार्थ्यांनाही याचा लाभ होणार आहे.
२. याशिवाय एमएच-सीईटी परीक्षा आता माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळाच्या अभ्यासक्रमावर (एसएससी आणि एचएससी बोर्ड) आधारित असणार आहे. आतापर्यंत फक्त सीबीएसई, आयसीएसई बोर्डावर आधारित अभ्यासक्रमावर सीईटी परीक्षा घेण्यात येत होती. यामुळे ग्रामीण भागात राहाणार्‍या आणि गरीब विद्यार्थ्यांना या परीक्षेचा अभ्यास करणे कठीण जात असे. त्यामुळे महाराष्ट्रातील अधिकाधिक विद्यार्थ्यांना सीईटी परीक्षेची संधी मिळावी यासाठी एमएच-सीईटी परीक्षा आता एसएससी आणि एचएससी बोर्ड अभ्यासक्रमावर आधारित असणार आहे. याचा फायदा तळागाळातील विद्यार्थ्यांनाही होणार आहे. ‘नीट’ परीक्षेचा अभ्यासक्रम हा सीबीएसईच्या धर्तीवर आहे. परंतु, महाराष्ट्रातील ग्रामीण भागात जास्तीत जास्त विद्यार्थी हे एसएससी बोर्डाचे असतात. त्यामुळे या दोन्ही अभ्यासक्रमांमध्ये तफावत असल्यामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना सीबीएसईच्या धर्तीवरील परीक्षा अचानक देण्यास सांगितल्यास त्यांच्यावर अन्याय होऊ शकतो, अशी भूमिका आम्ही सर्वोच्च न्यायालयात मांडणार आहोत.
३. २०१३ साली सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठाने नीट परीक्षा रद्द केली होती आणि या परीक्षेत बदल करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसारच महाराष्ट्रात एमएच-सीईटी परीक्षा घेण्यात येणार आहे.
४. सीबीएसई मार्फत ‘नीट’ परीक्षा दोन टप्प्यात घेण्यात येणार आहे. १ मे आणि २४ जुलै रोजी दोन वेगळ्या परीक्षा होतील. या परीक्षांच्या प्रश्‍नपत्रिका वेगळ्या असतील, दोन्ही परीक्षांचे गुणांकन वेगवेगळे होईल, त्यामुळे त्याची गुणवत्ता यादी एकच कशी असू शकेल, हा मुद्दाही न्यायालयात उपस्थित करण्यात येईल.
५. महाराष्ट्राच्या विद्यार्थ्यांनी आतापर्यंत एमएच-सीईटी परीक्षेसाठी एचएससी बोर्डाच्या अभ्यासक्रमाचा अभ्यास केला आहे. त्यामुळे आता जर सीईटी परीक्षा अचानक रद्द झाल्यास विद्यार्थ्यांचे मोठ्या प्रमाणात शैक्षणिक नुकसान होणार आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना न्याय मिळावा, अशी मागणी या फेरविचार याचिकेतून करण्यात येणार आहे.

Posted by : | on : 30 Apr 2016
Filed under : ठळक बातम्या, महाराष्ट्र
Author Description : .
You can follow any responses to this entry through the RSS 2.0
You can leave a response or trackback to this entry

Related posts

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g