किमान तापमान : 31.08° C
कमाल तापमान : 33.02° C
तापमान विवरण : scattered clouds
आद्रता : 55 %
वायू वेग : 7.11 Mps
स्थळ : Mumbai, IN
33.02° C
28.14°C - 33.99°C
scattered clouds28.46°C - 31.17°C
sky is clear28.9°C - 33.02°C
sky is clear29.05°C - 32.57°C
sky is clear28.8°C - 32.08°C
sky is clear28.33°C - 31.04°C
sky is clearअलिबाग/मुंबई, [२९ ऑगस्ट] – देशभरात खळबळ उडविणार्या शीना बोरा हत्याकांडाला आज शनिवारी वेगळेच वळण मिळाले आहे. तीन वर्षांपूर्वी शीनाचा जळालेला मृतदेह आढळून आल्यानंतर हत्या किंवा अकस्मात मृत्यू, असा कोणताही गुन्हा त्यावेळी दाखल करण्यात आला नव्हता, अशी कबुली रायगड पोलिसांनी आज शनिवारी दिली. तर, राज्याचे पोलिस महासंचालक संजीव दयाळ यांनी रायगड पोलिसांविरुद्ध कारवाई करण्याचा इशारा दिला.
२३ मे २०१२ रोजी शीनाचा जळालेला मृतदेह आढळून आल्यानंतरही पोलिसांनी हे प्रकरण अगदी सहजपणे घेतले होते, अशी कबुली रायगड पोलिसांनी प्रथमच दिल्याने हे प्रकरण आता अधिकच गुंतागुंतीचे झाले आहे. पोलिसांनी हा मृतदेह लगेच मुंबईतील जे. जे. रुग्णालयात उत्तरीय तपासणीसाठी पाठविला होता. पण, रुग्णालयाकडून कोणताही अहवाल तातडीने प्राप्त झाला नव्हता, अशी माहिती रायगडचे पोलिस अधीक्षक सुवेज हक यांनी जिल्हा पोलिस मुख्यालयात पत्रकारांशी बोलताना दिली. खर तरं, जळालेल्या स्थितीत मृतदेह आढळून आल्यानंतर आम्ही अपघाती मृत्यू किंवा हत्येचा गुन्हा नोंदवायला हवा होता. या प्रकरणात कुठे त्रुटी राहिल्या, याबाबतचा तपास करण्याचे आदेश वरिष्ठांकडून मला देण्यात आले आहेत, असे ते म्हणाले.
आम्ही आपल्या वरिष्ठांना वास्तवाची माहिती दिली आहे. कोकण विभागाच्या पोलिस महानिरीक्षकांनी मला चौकशीचे आदेश दिले असून, शक्य तितक्या लवकर तपास पूर्ण करणार आहोत, असे त्यांनी सांगितले. तीन वर्षांच्या काळात पोलिसांना या प्रकरणाचे गांभीर्य कळले नव्हते का, असे विचारले असता, त्यांनी उत्तर देण्याचे टाळले.
दरम्यान, सुवेज हक यांच्या खळबळजनक खुलाशामुळे अनेक गंभीर प्रश्न निर्माण झाल्याने पोलिस महासंचालक संजीव दयाळ यांनी या प्रकरणाची स्वत: दखल घेतली आहे. रायगड पोलिस दलातील दोषी अधिकार्यांची चौकशी करून, कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशारा दयाल यांनी वृत्तसंस्थेशी बोलताना दिला.