Posted by वृत्तभारती
Tuesday, November 18th, 2014
चौफेर : अमर पुराणिक मोदी मंत्रीमंडळावर डॉक्टर्स, इंजिनीअर्स, बँकर्स अशा स्कॉलर लोकांचा पगडा आहे. सामाजिक क्षेत्राबरोबर राजकारणही ‘शिकलेल्यांचे क्षेत्र’ होत असेल त्याचे भरभरून स्वागतच करायला हवे. हुशार व्यक्तींच्या कौशल्यांचा व त्यांच्या स्वच्छ प्रतिमेचा राष्ट्रीय राजकारणात सहभाग करून घेत ‘अच्छे दिन’ आणण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेला हा प्रयत्न सफल होणार यांत शंका नाही. मे महिन्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्राची धूरा हाती घेतली. त्यावेळी मंत्रीमंडळ स्थापन करताना त्यांनी कोणताही पसारा...
18 Nov 2014 / No Comment /
Posted by वृत्तभारती
Monday, March 24th, 2014
प्रहार : दिलीप धारूरकर आता लोकांना नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भारतीय जनता पार्टी, हाच एकमेव पर्याय आहे, असे दिसत आहे. तीन प्रकारे ही अनुकूलता समोर येते आहे : एक- मोदी जातील तेथे प्रचंड, अभूतपूर्व गर्दीच्या विराट सभा, प्रचंड उत्साह दिसतो आहे. दुसरे- सगळ्या सर्वेक्षणांत वरचेवर मोदी, भाजपा आणि राष्ट्रीय लोकशाही आघाडी यांची लोकप्रियता वाढताना दिसते आहे. तिसरे म्हणजे- एम. जे. अकबर, किरण बेदी, सत्पाल महाराज, चेतन भगत अशा कितीतरी विचारवंत,...
24 Mar 2014 / No Comment /
Posted by वृत्तभारती
Monday, March 24th, 2014
मुस्लीम जगत : मुजफ्फर हुसैन जगात या घडीला लहान-मोठ्या मिळून ११० मुस्लिम दहशतवादी संघटना कार्यरत आहेत. यात अल् कायदासारख्या विश्वविख्यात आहेत, तर काही संघटना एवढ्या छोट्या आहेत की, त्या फक्त स्थानीय स्तरावर आपल्या कारवाया करीत असतात. आपला प्रभाव दाखवण्यासाठी सर्वच संघटना, इस्लामच्या नावावर आम्ही समर्पित आहोत, असे सांगत असतात. पण, वास्तव हे आहे की, यातील बहुतांश संघटना आपल्या वैयक्तिक महत्त्वाकांक्षा आणि स्वार्थासाठी सक्रिय आहेत. कोणताही मुस्लिम इस्लामच्या नावावर काहीही करू...
24 Mar 2014 / No Comment /
Posted by वृत्तभारती
Monday, February 17th, 2014
प्रहार : दिलीप धारुरकर लोकहो, यांचे खरे रूप लक्षात घ्या! – [pullquote]आंध्रचे मुख्यमंत्री, तेलंगणाला विरोध करणारे लोक, खासदार यांना न जुमानता घिसाडघाईने बहुमताच्या बळावर, राजकीय लोकरंजनाचे शस्त्र दाखवित विरोधी पक्षांनाही मान्यता द्यायला लावून तेलंगणाचे विधेयक संसदेत आणण्याचा घाट कॉंग्रेसने घातला. सोनिया गांधींची इच्छा म्हणून जसे अन्नसुरक्षा विधेयक आणले तसे त्यांच्याच नावाने हे तेलंगणा विधेयक आणण्याचा प्रयत्न केला गेला. राजकीय श्रेय एका व्यक्तीला देण्याचा हा सवंग प्रयत्न होता. मांजराला जर खोलीत...
17 Feb 2014 / No Comment /
Posted by वृत्तभारती
Saturday, February 8th, 2014
मुस्लिम जगत : मुजफ्फर हुसेन २०१४ च्या निवडणुका जसजशा जवळ येत आहेत, कॉंग्रेसला चिंता सतावू लागली आहे की, आपली वफादार मुस्लिम व्होट बँक आपला साथ देईल की नाही? गेल्या अनेक निवडणुकांमध्ये दलित व्होट कॉंग्रेसपासून दूर गेल्याचे स्पष्ट झाले आहे. मायावतीचा जेव्हापासून उदय झाला, तेव्हापासून या व्होट बँकेला तडा गेला आहे. गेल्या संसदेत मायावतींनी भलेही संपुआला समर्थन दिले असेल, पण निवडणुकीत मात्र त्या कॉंग्रेसला एकहाती आव्हान देणारच आहेत. बसपासारखा मुस्लिमांचा राजकीय...
8 Feb 2014 / No Comment /
Posted by वृत्तभारती
Saturday, February 8th, 2014
अन्वयार्थ : तरुण विजय आता विमानतळांवर खासदार, आमदार यांच्या सोयीसुविधांमध्ये अधिकच वाढ होणार आहे, असे जेव्हा ऐकण्यात आले तेव्हा यात काहीही आश्चर्य वाटले नाही. हा देश आता तुकडा-तुकडा विशेषाधिकारसंपन्न गटांचा केवळ समुच्चयमात्र बनून राहिला आहे. संपूर्ण देश, सारे नागरिक, समाज कोणाचाही नाही. केवळ विशेष सुविधा, विशेष पॅकेज, विशेष आरक्षण, विशेष सुरक्षा आणि विशेष योजनांचा लाभ घेणारे काही वर्ग आहेत, जे सगळे मिळून एक देश बनले आहेत. अल्पसंख्यकांच्या नावाखाली काही विशेषाधिकार...
8 Feb 2014 / No Comment /
Posted by वृत्तभारती
Friday, February 7th, 2014
प्रहार : दिलीप धारुरकर दिल्लीच्या राजकारणात दादागिरीचा अवतार! – पूर्वी दादागिरी करणारे लोक बाहेरून राजकारण्यांना पाठबळ द्यायचे. नंतर नंतर त्यांच्या लक्षात आले की आपल्याच बळावर राजकारण चालते तर आपणच नेता का होऊ नये? असा एक बाहुबली दादा पंधरा वर्षांपूर्वी पहिल्यांदा राजकारणात आलेला मी पाहिला आहे. गुंडगिरी अंगात भिनलेली असल्याने तो आपल्या वॉर्डात गुंडगिरी करून चकाचक रस्ते, कोणत्या गल्लीला पाणी मिळत नसेल तर पालिकेच्या कर्मचार्यांना शिवीगाळ -दमदाटी करून त्यांना मेन पाईपलाईन...
7 Feb 2014 / No Comment /
Posted by वृत्तभारती
Thursday, February 6th, 2014
अन्वयार्थ : तरुण विजय भारत आपल्या नियतीकडे मार्गस्थ होत आहे का? – दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांनी धरणे देणे, जैन समाजाचे अल्पसंख्यक घोषित होणे, रुपयाची किंमत डॉलरच्या तुलनेत सातत्याने घसरत जाणे आणि पुन्हा भारतीय मासेमारांची श्रीलंकेकडून झालेली अटक… या सार्या घटना एकमेकांशी असंबद्ध वाटतात. मात्र, यातून केवळ एकच संदेश मिळतो आणि तो म्हणजे दिल्लीत प्रचंड प्रमाणात अनागोंदी, अराजकता आहे. देशात निव्वळ तमाशा, राज्यघटनेशी खेळ सुरू असून देशावर कुणाचेही, कसलेही नियंत्रण नाही, हेच पावलोपावली...
6 Feb 2014 / No Comment /