|
|
पंचांग Vrittabharati
मास : | वार : | तिथी :
नक्षत्र : | राशी :
करण : | योग :
सूर्योदय : 05:59 | सूर्यास्त : 18:47
अयनांश :
हवामान

किमान तापमान : 29.64° C

कमाल तापमान : 30.99° C

तापमान विवरण : clear sky

आद्रता : 70 %

वायू वेग : 5.53 Mps

स्थळ : Mumbai, IN

30.99° C

Weather Forecast for
Monday, 06 May

28.07°C - 31.6°C

sky is clear
Weather Forecast for
Tuesday, 07 May

28.44°C - 30.65°C

sky is clear
Weather Forecast for
Wednesday, 08 May

28.13°C - 30.46°C

sky is clear
Weather Forecast for
Thursday, 09 May

27.94°C - 30.17°C

sky is clear
Weather Forecast for
Friday, 10 May

27.65°C - 29.86°C

sky is clear
Weather Forecast for
Saturday, 11 May

27.75°C - 29.93°C

sky is clear
Home » आंतरराष्ट्रीय, आशिया » आदित्य-एल१ च्या यशावर पाकिस्तानी संतप्त

आदित्य-एल१ च्या यशावर पाकिस्तानी संतप्त

नवी दिल्ली, (०३ सप्टेंबर) – चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर चांद्रयान-३ च्या सुरक्षित लँडिंगनंतर भारतीय अंतराळ संस्था इस्रोने आदित्य-एल१ चे यशस्वी प्रक्षेपण करून इतिहास रचला आहे. मात्र, अंतराळ क्षेत्रातील भारताची प्रगती आणि यश आपल्या शेजारी देश पाकिस्तानमधील काही लोकांना पसंत पडत नाही.
आदित्य-एल१ च्या यशस्वी प्रक्षेपणाबद्दल, अनेक पाकिस्तानी लोकांच्या प्रतिक्रिया आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत ज्यात भारताच्या प्रगतीबद्दल त्यांची ईर्षा दिसून येत आहे. आदित्य-एल१ च्या यशावर पाकिस्तानी संतप्त मिशनच्या यशानंतर काही स्थानिक माध्यमांनी याबाबत पाकिस्तानी लोकांचे मत विचारले असता त्यांनी आश्चर्यकारक प्रतिक्रिया दिली. आदित्य-एल१ च्या यशावर पाकिस्तानी संतप्त मोहिमेबाबत एका महिलेने सांगितले की, ’भारत हा आपला शत्रू आहे, ते चंद्र-सूर्याकडे जात आहेत, जर ते पुढे गेले तर तो आपला अपमान आहे.’ एका पाकिस्तानी माणसाने सांगितले की, ही काही मोठी गोष्ट नाही, आपणही एक दिवस चंद्र-सूर्यापर्यंत पोहोचू.
मात्र, यावर एका पाकिस्तानी नागरिकाने आपल्या सरकारवरही टीका केली असून, भारत आपल्यापेक्षा एक हजार वर्षे पुढे गेला असून, त्यांच्याशी स्पर्धा नाही, असे ते म्हणाले. ते शास्त्रज्ञाला राष्ट्रपती बनवतात आणि पाकिस्तान त्या शास्त्रज्ञाला माफी मागायला लावतात. मीडियाच्या प्रश्नावर आणखी एका पाकिस्तानी नागरिकाने सांगितले की, भारताने पाकिस्तानकडे दुर्लक्ष केले आहे, आता ते अमेरिका आणि चीनशी स्पर्धा करत आहेत, पाकिस्तान स्वत:च्या मृत्यूने मरेल. आदित्य-एल१ च्या यशावर एका पाकिस्तानी महिला पत्रकाराने सांगितले की, भारत आणि पाकिस्तानमध्ये कोणतीही स्पर्धा नाही, आम्ही शून्यावर उभे असताना ते १०० पावले पुढे आहेत. त्यांचा विकास दर सात टक्के आहे तर आमचा शून्य आहे. भारताच्या मदतीशिवाय पाकिस्तान पुढे जाऊ शकत नाही.
याबाबत एका पाकिस्तानी नागरिकाने आपल्या सरकारला दोष देत भारत चंद्र-सूर्याकडे गेला असून आपण भूमिगत झालो आहोत, असे म्हटले आहे. एका पाकिस्तानी नागरिकाने सांगितले की, भारताची प्रगती पाहून त्याला भारतात जायचे आहे. तिथे उभ्या असलेल्या एका व्यक्तीने याला विरोध केला आणि शत्रू देशाची स्तुती कधीही करू नये, असे सांगितले. शनिवारी इस्रोने पीएसएलव्ही-सी५७/आदित्य-एल१ या पहिल्या सूर्य मोहिमेचे यशस्वी प्रक्षेपण केले.

Posted by : | on : 3 Sep 2023
Filed under : आंतरराष्ट्रीय, आशिया
Author Description : .
You can follow any responses to this entry through the RSS 2.0
You can leave a response or trackback to this entry

Related posts

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g