किमान तापमान : 30.51° C
कमाल तापमान : 32.16° C
तापमान विवरण : clear sky
आद्रता : 73 %
वायू वेग : 4.6 Mps
स्थळ : Mumbai, IN
32.16° C
29.13°C - 32.99°C
sky is clear29.26°C - 31.36°C
few clouds28.9°C - 30.93°C
sky is clear28.73°C - 29.71°C
broken clouds28.77°C - 29.73°C
light rain28.7°C - 29.89°C
light rain– अर्थमंत्री बिलावल भुट्टो यांची जाहीर कबुली,
संयुक्त राष्ट्र, (११ मार्च) – काश्मीर मुद्याला संयुक्त राष्ट्रसंघाच्या अजेंड्याचा केंद्रबिंदू करण्यासाठी आम्ही भरपूर प्रयत्न केले. मात्र, हे काम इतके सोपे नसल्याचे आता आमच्या लक्षात आले आहे. मित्र देश तर सोडाच, शेजारी देशांनीही आम्हाला यात सहकार्य केले नाही, आम्हाला एकाकी पाडले, अशी कबुली पाकिस्तानचे अर्थमंत्री बिलावल भुट्टो झरदारी यांनी दिली. येथे आयोजित पत्रपरिषदेत बोलताना झरदारी बरेच गोंधळलेले होते. त्यांनी आधी भारताला एक शेजारील देश असे संबोधले आणि नंतर भारत हा आमचा मित्र असल्याचे म्हटले.
काश्मीरला आंतरराष्ट्रीय मुद्दा बनवायचा आणि संयुक्त राष्ट्रात त्यासाठी पाठिंबा मिळवायचा, यासाठी आम्ही बरेच प्रयत्न केले. या मुद्यावर प्रत्येक वेळी मित्र राष्ट्रांना साथ मागितली. चर्चेचा विषय वेगळा असतानाही आम्ही काश्मीरवर भर दिला आहे. मात्र, तो भारत आणि पाकिस्तानमधील द्विपक्षीय मुद्दा असल्याचे सांगून आम्हाला कोणीही मदत केली नाही. मित्रांनीही साथ सोडली. काश्मीर प्रश्न उपस्थित झाला की मित्र देशच यावर आक्षेप घ्यायचे. हा संयुक्त राष्ट्रात उपस्थित करण्याचा मुद्दा नाही, तो तुमचा द्विपक्षीय प्रश्न आहे, चर्चेतून सोडवा, असा सल्ला ते देतात, याकडे बिलावल भुट्टो यांनी लक्ष वेधले. काश्मीर प्रश्नाला आंतरराष्ट्रीय मुद्दा बनविणे आता इतके सोपे नाही, याची जाणीव आम्हाला झाली आहे, पण आम्ही आमचे प्रयत्न सुरूच ठेवणार आहोत. आमच्यासाठी पॅलेस्टाईन आणि काश्मीर हा एकसारखाच मुद्दा आहे आणि त्याकडे लक्ष वेधण्याचा आमचा प्रयत्न कायम राहील, असे ते म्हणाले.