किमान तापमान : 27.29° C
कमाल तापमान : 27.88° C
तापमान विवरण : few clouds
आद्रता : 70 %
वायू वेग : 1.34 Mps
स्थळ : Mumbai, IN
27.29° C
26.99°C - 30.45°C
sky is clear27.3°C - 30.34°C
sky is clear27.48°C - 30.57°C
sky is clear28°C - 30.56°C
few clouds28°C - 30.08°C
sky is clear27.36°C - 29.66°C
few clouds– राहुल गांधींचा पॅरिसमधून हल्ला,
पॅरिस, (१० सप्टेंबर) – काँग्रेसचे खासदार राहुल गांधी सध्या युरोप भेटीवर आहेत. राहुल गांधी यांनी पॅरिसमधील स्कूल ऑफ इंटरनॅशनल अफेअर्सचे विद्यार्थी आणि शिक्षकांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी इंडिया विरुद्ध भारत आणि हिंदुत्व मुद्यावरून मोदी सरकारवर टीका केली. केंद्र सरकारची नीती लोकशाही देशाच्या दृष्टीने हिताची नाही, असे ते म्हणाले.
मी गीता वाचली आहे. उपनिषद वाचले आहेत तसेच हिंदू धर्माविषयी अनेक पुस्तके वाचली आहेत, पण भारतीय जनता पक्ष जे काम करीत आहे, त्यात काहीही हिंदुत्ववादी नाही. मोदी सरकार आपला इतिहास नष्ट करण्याचा प्रयत्न करीत आहे. आपला इतिहास नाकारला जाऊ शकत नाही. इंडिया म्हणजेच भारत असे आपल्या संविधानात लिहिले आहे. हे दोन्ही नावे देशातील प्रत्येक लोकांचे प्रतिनिधित्व करतात. एक विकेंद्रीय आणि लोकशाही भारताच्या राजनैतिक दृष्टिकोनातून देश पुढे नेण्यासाठी ते आवश्यक आहे, पण सध्याचे सरकार हे सर्व विसरत चालले आहे, असे राहुल गांधी म्हणाले.
भारत हा राज्यांचा एक संघ आहे. सर्व राज्य मिळून इंडिया किंवा भारत बनतो. सर्वांचा आवाज ऐकला जावा आणि कुणाचाही आवाज दाबला जाऊ नये अशी अपेक्षा असते. पण, सरकार इंडिया नावाचा त्याग करू इच्छित आहे. नाव बदलणे म्हणजे आपल्या इतिहासाला नाकारण्यासारखे आहे, अशी टीका त्यांनी केंद्र सरकारवर केली.