|
|
पंचांग Vrittabharati
मास : | वार : | तिथी :
नक्षत्र : | राशी :
करण : | योग :
सूर्योदय : 05:54 | सूर्यास्त : 18:51
अयनांश :
हवामान

किमान तापमान : 31.02° C

कमाल तापमान : 31.08° C

तापमान विवरण : scattered clouds

आद्रता : 78 %

वायू वेग : 3.95 Mps

स्थळ : Mumbai, IN

31.02° C

Weather Forecast for
Sunday, 19 May

29.12°C - 31.99°C

scattered clouds
Weather Forecast for
Monday, 20 May

29.16°C - 31.86°C

sky is clear
Weather Forecast for
Tuesday, 21 May

28.87°C - 31.44°C

sky is clear
Weather Forecast for
Wednesday, 22 May

29.04°C - 30.28°C

scattered clouds
Weather Forecast for
Thursday, 23 May

28.88°C - 30.36°C

overcast clouds
Weather Forecast for
Friday, 24 May

28.42°C - 30.44°C

overcast clouds
Home » अमेरिका, आंतरराष्ट्रीय » जागतिक अर्थव्यवस्थेत भारत आशेचे स्थान

जागतिक अर्थव्यवस्थेत भारत आशेचे स्थान

– आयएमएफच्या व्यवस्थापकीय संचालकांचे कौतुकोद्गार,
वॉशिंग्टन, (२२ फेब्रुवारी ) – जागतिक अर्थव्यवस्थेत भारत हे एक आशेचे स्थान असून, यंदाच्या जागतिक वृद्धीत हा देश एकटाच थोडे थोडके नव्हे तर, १५ टक्क्यांचे योगदान देईल, असे कौतुकोद्गार आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या (आयएमएफ) व्यवस्थापकीय संचालक क्रिस्टालिना जॉर्जिव्हा यांनी काढले. जगातील पाचव्या क्रमांकावर असलेल्या अर्थव्यवस्थेला डिजिटायझेशनने महामारीच्या काळातील खालच्या पातळीवरून बाहेर काढले असताना, विवेकपूर्ण वित्तीय धोरणे आणि पुढील वर्षाच्या अर्थसंकल्पात भांडवली गुंतवणुकीसाठी महत्त्वपूर्ण वित्तपुरवठा करण्याबाबत घेण्यात आलेल्या निर्णयामुळे विकासाचा वेग कायम राखण्यात मदत होईल.
भारताची कामगिरी खूप प्रभावी आहे. या वर्षासाठी आम्हाला आशा आहे की, भारत मार्चमध्ये संपणार्या वर्षासाठी ६.८ टक्क्यांचा उच्च दर राखेल. आर्थिक वर्ष २०२३-२४ साठी आम्ही ६.१ टक्के हा उर्वरित जागतिक अर्थव्यवस्थेप्रमाणे मंदावणारा, पण जागतिक सरासरीपेक्षा खूप वरचा अंदाज वर्तवतो. अशा प्रकारे भारत २०२३ मध्ये जागतिक वृद्धीत जवळपास १५ टक्क्यांचे योगदान देईल, असे जॉर्जिव्हा यांनी वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत सांगितले. जगातील प्रमुख अर्थव्यवस्थांमध्ये हा सर्वांत वेगवान विकासदर आहे. जागतिक वृद्धीचा मागील वर्षी असलेल्या ३.४ टक्क्यांचा दर यंदा घसरून २.९ टक्क्यांवर येणार असून, २०२३ हे जागतिक वृद्धीसाठी अत्यंत कठीण वर्ष आहे आणि अशा परिस्थितीत भारत एक आशेचे स्थान ठरणार आहे, असे निरीक्षण जॉर्जिव्हा यांनी नोंदवले.
अर्थसंकल्प उत्कृष्ट
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन् यांनी सादर केलेला अर्थसंकल्प आहे. अर्थमंत्र्यांनी अतिशय विचारपूर्वक तो सादर केला असून, त्यातील दोन गोष्टींनी मी प्रभावित झाली आहे. पहिली गोष्ट म्हणजे, भारतात आर्थिक जबाबदारीसह विकासाच्या गरजा संतुलित करण्यासाठी घेतलेली काळजी आणि दुसरी म्हणजे, भांडवली खर्चातील गुंतवणूक, ज्यामुळे वाढीसाठी दीर्घकालीन ठोस आधार मिळतो, असे जॉर्जिव्हा यांनी सांगितले.

Posted by : | on : 23 Feb 2023
Filed under : अमेरिका, आंतरराष्ट्रीय
Author Description : .
You can follow any responses to this entry through the RSS 2.0
You can leave a response or trackback to this entry

Related posts

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g