|
|
पंचांग Vrittabharati
मास : | वार : | तिथी :
नक्षत्र : | राशी :
करण : | योग :
सूर्योदय : 05:54 | सूर्यास्त : 18:51
अयनांश :
हवामान

किमान तापमान : 31.01° C

कमाल तापमान : 32.33° C

तापमान विवरण : clear sky

आद्रता : 71 %

वायू वेग : 4.52 Mps

स्थळ : Mumbai, IN

32.33° C

Weather Forecast for
Sunday, 19 May

29.12°C - 32.99°C

sky is clear
Weather Forecast for
Monday, 20 May

29.33°C - 31.9°C

few clouds
Weather Forecast for
Tuesday, 21 May

28.86°C - 31.58°C

sky is clear
Weather Forecast for
Wednesday, 22 May

28.78°C - 30.34°C

broken clouds
Weather Forecast for
Thursday, 23 May

28.76°C - 30.2°C

scattered clouds
Weather Forecast for
Friday, 24 May

28.59°C - 30.45°C

overcast clouds
Home » अमेरिका, आंतरराष्ट्रीय » पाकिस्तान उत्तर देण्याच्या लायकीचा नाही

पाकिस्तान उत्तर देण्याच्या लायकीचा नाही

– भारताचा सुरक्षा परिषदेत घणाघात,
न्यू यॉर्क, (९ मार्च) – सुरक्षा परिषदेत महिला, शांतता आणि सुरक्षा या मुद्यावर चर्चा सुरू असताना पाकिस्तानचे परराष्ट्र व्यवहार मंत्री बिलावल भुट्टो यांनी आळवलेल्या जम्मू-काश्मीरच्या रागावर भारताने घणाघात केला. दुर्भावनापूर्ण अपप्रचार करणारा पाकिस्तान उत्तर देण्याच्या लायकीचा नाही, असे भारताने खडसावले आहे.
बिलावल भुट्टो झरदारी यांनी जम्मू-काश्मीरबाबत केलेल्या टीकेला प्रत्युत्तर देताना संयुक्त राष्ट्रसंघातील भारताच्या कायम प्रतिनिधी रुचिरा कंबोज यांनी मंगळवारी त्यांचे वक्तव्य निराधार आणि राजकीयदृष्ट्या प्रेरित असल्याचे म्हटले. माझे निवेदन संपवण्यापूर्वी मी जम्मू-काश्मीर या केंद्रशासित प्रदेशाबाबत पाकिस्तानच्या प्रतिनिधीने केलेले फालतू, निराधार आणि राजकीय प्रेरित वक्तव्य फेटाळून लावते, असे कंबोज यांनी सांगितले.
महिला, शांतता आणि सुरक्षा, या विषयावरील सुरक्षा परिषदेत खुल्या चर्चेत बोलताना कंबोज म्हणाल्या, माझ्या शिष्टमंडळाला अशा दुर्भावनापूर्ण आणि खोट्या प्रचाराला प्रत्युत्तर देण्याचीही गरज वाटत नाही. त्याऐवजी नेहमीप्रमाणेच आमचे लक्ष सकारात्मकतेकडे तसेच पुढे पाहण्याकडे आहे. महिला, शांतता आणि सुरक्षा अजेंड्याच्या पूर्ण अंमलबजावणीला गती देण्यासाठी आमच्या सामूहिक प्रयत्नांना बळ देण्यासाठी आजची चर्चा अत्यंत महत्त्वाची आहे. आम्ही चर्चेच्या विषयाचा आदर करतो आणि वेळेचे महत्त्व ओळखतो. त्यामुळे आमचे लक्ष या विषयावर राहील, असे कंबोज यांनी सांगितले.
आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या पूर्वसंध्येला या महिन्यात मोझांबिकच्या अध्यक्षतेखाली झालेल्या परिषदेच्या चर्चेत पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री बिलावल भुट्टो यांनी जम्मू-काश्मीरचा उल्लेख केल्यावर कंबोज यांनी सणसणीत उत्तर दिले आहे. जम्मू-काश्मीर आणि लडाख हा संपूर्ण प्रदेश भारताचा भाग आहे आणि नेहमीच तो भारताचा भाग राहील, असे भारताने यापूर्वी पाकिस्तानला ठणकावले आहे.

Posted by : | on : 9 Mar 2023
Filed under : अमेरिका, आंतरराष्ट्रीय
Author Description : .
You can follow any responses to this entry through the RSS 2.0
You can leave a response or trackback to this entry

Related posts

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g