किमान तापमान : 27.29° C
कमाल तापमान : 27.88° C
तापमान विवरण : few clouds
आद्रता : 70 %
वायू वेग : 1.34 Mps
स्थळ : Mumbai, IN
27.29° C
26.99°C - 30.45°C
sky is clear27.3°C - 30.34°C
sky is clear27.48°C - 30.57°C
sky is clear28°C - 30.56°C
few clouds28°C - 30.08°C
sky is clear27.36°C - 29.66°C
few cloudsइस्लामाबाद, (११ जुलै) – सध्या पाकिस्तानच्या पूर्व लाहोरमध्ये आलेल्या पुरामुळे आतापर्यंत ७६ जणांचा मृत्यू झाला आहे. मात्र तेथील लोकांनी या पुरासाठी भारताला जबाबदार धरले आहे. पुरासाठी भारतावर आरोप करत पाकिस्तानी लोक म्हणाले की, भारत गरज असताना पाणी देत नाही आणि गरज नसताना पाणी देतो. पाकिस्तानच्या मीडिया रिपोर्टनुसार, भारताने किमान १ लाख ८५ हजार क्युसेक पाणी सोडले आहे. यानंतर पाकिस्तानच्या राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने पूरस्थितीचा इशारा जारी केला आहे.
पाकिस्तानच्या रावी नदीच्या पाण्याची पातळी वाढण्याचा इशारा देण्यात आला आहे. जेव्हा पाकिस्तानी यूट्यूबरने भारताकडून पाणी सोडण्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. यावर एका वृद्ध पाकिस्तानी व्यक्तीने सांगितले की, ही भारताची इच्छा आहे. त्याला पाहिजे तेव्हा तो पाणी सोडू शकतो किंवा अडवू शकतो. हा दोष आपल्या पाकिस्तान सरकारचा आहे, जे सतत भारताला दोष देतात. पाकिस्तानी राज्यकर्त्यांविरोधात बोलताना या वृद्ध व्यक्तीने सांगितले की, दोन वर्षांपूर्वी धरण बांधण्याची चर्चा झाली होती. निधी जमा झाला, पण काही झाले नाही. ते म्हणाले की, पाकिस्तानमध्ये धरणाची नितांत गरज आहे. पाकिस्तानात गेल्या वर्षी आलेल्या पुरात सुमारे १७०० लोकांचा मृत्यू झाला होता. त्यादरम्यान १० लाखांहून अधिक लोक बेघर झाले होते. त्याचवेळी मरण पावलेल्या गुरांची संख्या १ कोटीच्या जवळपास होती. एका अंदाजानुसार गरीब पाकिस्तानचे ८० हजार कोटी रुपयांचे नुकसान झाले होते. असे असतानाही देशातील सरकार धरण बांधण्यात रस दाखवत नाही.