किमान तापमान : 28.59° C
कमाल तापमान : 28.86° C
तापमान विवरण : scattered clouds
आद्रता : 75 %
वायू वेग : 1.74 Mps
स्थळ : Mumbai, IN
28.86° C
27.84°C - 30°C
few clouds27.41°C - 29.88°C
sky is clear27.82°C - 30.19°C
sky is clear28.29°C - 30.24°C
sky is clear27.9°C - 30.83°C
light rain28.33°C - 30.41°C
light rainमनीला, (३० मार्च) – दक्षिण फिलिपाइन्समध्ये २५० जणांना घेऊन जाणारी बोट उलटली. ज्यामध्ये ३१ जणांचा मृत्यू झाला. या अपघातात ३१ जणांचा मृत्यू झाला आहे, तर ७ जण अद्याप बेपत्ता आहेत. बासिलानच्या दक्षिणेकडील बेटाचे गव्हर्नर जिम हातामन यांनी सांगितले की, आग लागल्याने काही लोकांनी घाबरून पाण्यात उड्या मारल्या, मात्र नौदल आणि मच्छिमारांसह इतर कर्मचार्यांच्या मदतीने त्यांना बाहेर काढण्यात आले. तर ७ जण अजूनही बेपत्ता आहेत. त्यांचा शोध घेतला जात आहे. जळालेली बोट बासिलानच्या किनार्यावर आणल्याचे हातमन यांनी सांगितले. येथे बोटीच्या एका केबिनमधून १८ जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले.
आगीचे कारण तपासले जात असल्याचे हातमन यांनी सांगितले. मात्र, बोटीवर अतिरिक्त प्रवासी असल्याची माहिती मिळाली असून, त्यांची माहिती देण्यात आलेली नाही. ही बोट झांबोआंगा येथून सुलूमधील जोलो शहराकडे जात होती. आगीमुळे बोटीत गोंधळ सुरू असताना काही लोकांनी घाबरून पाण्यात उड्या मारल्या. या अपघातात सुमारे २३ जण जखमी झाले आहेत.