|
|
पंचांग Vrittabharati
मास : | वार : | तिथी :
नक्षत्र : | राशी :
करण : | योग :
सूर्योदय : 06:00 | सूर्यास्त : 18:46
अयनांश :
हवामान

किमान तापमान : 30.08° C

कमाल तापमान : 30.69° C

तापमान विवरण : few clouds

आद्रता : 52 %

वायू वेग : 5.46 Mps

स्थळ : Mumbai, IN

30.69° C

Weather Forecast for
Friday, 03 May

27.24°C - 30.99°C

sky is clear
Weather Forecast for
Saturday, 04 May

27.63°C - 30.65°C

sky is clear
Weather Forecast for
Sunday, 05 May

27.77°C - 31.02°C

sky is clear
Weather Forecast for
Monday, 06 May

28.29°C - 31.38°C

sky is clear
Weather Forecast for
Tuesday, 07 May

28.45°C - 30.48°C

sky is clear
Weather Forecast for
Wednesday, 08 May

27.86°C - 30.01°C

sky is clear
Home » आंतरराष्ट्रीय, आशिया » बाप्पा रावळ यांच्या नावावरून पडले रावळपिंडी हे नाव

बाप्पा रावळ यांच्या नावावरून पडले रावळपिंडी हे नाव

– पाकिस्तानी लेखक सज्जाद अजहर यांचा उघडपणे दावा,
रावळपिंडी, (२१ जुलै) – पाकिस्तानचे लष्करी मुख्यालय असलेल्या रावळपिंडी शहराबाबत नुकताच एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ पाकिस्तानचे प्रसिद्ध लेखक सज्जाद अजहर यांचा आहे. ‘रावळपिंडी’ हे नाव हिंदू राजा महाराणा बाप्पा रावळ यांच्या नावावरून पडले आहे, असा दावा सज्जाद यांनी केला आहे. १९४७ मध्ये भारताची फाळणी होऊन पाकिस्तानची निर्मिती झाली. या फाळणीमुळे निर्माण झालेला पाकिस्तान हा इस्लामिक धार्मिक देश बनला. फाळणीपूर्वी भारतात अनेक प्रसिद्ध शहरे होती. यापैकी एक रावळपिंडी आहे. हिंदू राजा महाराणा बाप्पा रावळ यांच्या नावावरून या शहराचे नाव रावळपिंडी पडले आहे, असा दावा करणार्या सज्जाद अजहर यांचा हा व्हिडीओ प्रचंड लोकप्रिय होत आहे.
महाराणा बाप्पा रावळ यांनी ग्रॅण्ड ट्रंक रोडवर दर १५० किलोमीटर अंतरावर एक लष्करी चौकी उभारली होती; जेणेकरून कोणत्याही शत्रूला थेट शहरात प्रवेश करता येणार नाही. त्यांनी ज्या चौक्या उभारल्या, त्यापैकी एका चौकीचे नाव रावळपिंडी होते. नंतर याच चौकीचे नाव शूर हिंदू राजा बाप्पा रावळ यांच्या नावावरून रावळपिंडी पडले. राजस्थानचे सुपुत्र हिंदू राजा महाराणा बाप्पा रावळ यांचे साम्राज्य अतिशय दूरवरच्या ठिकाणी म्हणजे भारतापासून अफगाणिस्तानपर्यंत पसरली होते.
रावळपिंडीचा इतिहास काय आहे? असा प्रश्न लेखक सज्जाद अजहर यांना एका मुलाखतीत विचारण्यात आला होता. त्यांनी सांगितले की, रावळपिंडीमधील पहिली लष्करी चौकी आठव्या शतकातच बांधली गेली होती आणि त्या लष्करी चौकीची स्थापना बाप्पा रावळ यांनी केली होती. त्याच बाप्पा रावळ यांनी इसवीसन ७१२ मध्ये आज जिथे पाकिस्तान आहे, तेथे राज्य करणार्या अरब शासकांचा पराभव करून त्यांना तेथून हाकलून लावले. त्या काळात येथे मोहम्मद बिन कासिम नावाचा एक अरब शासक होता, त्याची सत्ता मुलतानपर्यंत होती, पण तत्कालीन हिंदू राजा महाराणा बाप्पा रावळ यांनी मुलतानमधून मोहम्मद बिन कासिमची राजवट उखडून टाकली आणि त्याला इराणला पळून जाण्यास भाग पाडले.
सज्जाद अजहर म्हणाले, तत्कालीन हिंदू राजा महाराणा बाप्पा रावळ यांनी आपल्या जबरदस्त पराक्रमाने अरब शासकांना शांतता लाभू दिली नाही. यानंतर बाप्पा रावळ आज जिथे पाकिस्तान आहे, तिथे परतले तेव्हा शत्रूचे हल्ले टाळण्यासाठी कायमस्वरूपी लष्करी चौकी स्थापन करावी, असा विचार त्यांनी केला. बाप्पा रावळ यांनी ग्रॅण्ड ट्रंक रोडवर दर १५० किलोमीटर अंतरावर एक लष्करी चौकी उभारली होती, जेणेकरून कोणत्याही शत्रूला थेट शहरात प्रवेश करता येणार नाही. त्यातीलच एक रावळपिंडी या चौकीचे नाव रावळपिंडी शहराला पडले आहे.

Posted by : | on : 21 Jul 2023
Filed under : आंतरराष्ट्रीय, आशिया
Author Description : .
You can follow any responses to this entry through the RSS 2.0
You can leave a response or trackback to this entry

Related posts

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g