किमान तापमान : 29.71° C
कमाल तापमान : 31.9° C
तापमान विवरण : clear sky
आद्रता : 69 %
वायू वेग : 1.95 Mps
स्थळ : Mumbai, IN
31.9° C
29.16°C - 32.99°C
sky is clear29.08°C - 30.31°C
sky is clear28.89°C - 31.01°C
sky is clear28.97°C - 30.48°C
sky is clear28.69°C - 29.96°C
few clouds28.76°C - 30.02°C
broken clouds– पंतप्रधान मोदी यांची फ्रेंच वृत्तपत्राला मुलाखत,
नवी दिल्ली, (१३ जुलै) – विविधता असतानाही सुसंवाद शक्य असल्याचे जगातील सर्वांत मोठी लोकशाही म्हणून भारताने दाखवून दिले आहे तसेच देशाला त्याचे योग्य स्थान देण्यासाठी आंतरराष्ट्रीय प्रणाली आणि संस्थांमध्ये समायोजनाची नैसर्गिक अपेक्षा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘लेस ईकोज’ या वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत अधोरेखित केली. भारताचे तरुण आणि कुशल कामगार मोकळेपणा आणि लोकशाही मूल्यांनी भारलेले आहेत आणि तंत्रज्ञान स्वीकारण्यास आणि बदलत्या जगाशी जुळवून घेण्यास उत्सुक आहेत, असे नरेंद्र मोदी यांनी सांगितले.
आज जगातील अनेक देश वृद्ध होत आहेत आणि त्यांची लोकसंख्या कमी होत आहे, त्यावेळी भारतातील तरुण आणि कुशल मनुष्यबळ येत्या काही दशकांमध्ये जगासाठी एक संपत्ती असेल. अतुलनीय सामाजिक आणि आर्थिक विविधता असलेली जगातील सर्वांत मोठी लोकशाही म्हणून आपले यश दाखवून देईल की, लोकशाही उद्धार करते, विविधतेत सुसंवाद शक्य आहे, असे मोदी यांनी या मुलाखतीत म्हटले आहे.
मानवतेच्या एकषष्ठांश लोकांच्या प्रगतीमुळे जगाला अधिक समृद्ध आणि शाश्वत भविष्य मिळेल, देश सर्वाधिक लोकसंख्येचा देश बनल्याने जागतिक स्तरावर भारताची स्थिती कशी बदलते, या प्रश्नाला उत्तर देताना मोदींनी सांगितले. शांतता, मोकळेपणा, सौहार्द आणि सहअस्तित्व ही आपली खोलवर रुजलेली मूल्ये, आपल्या चैतन्यशील लोकशाहीचे यश, आपली संस्कृती, परंपरा आणि तत्त्वज्ञानाची विलक्षण समृद्धता, शांततापूर्ण, निष्पक्ष आणि न्याय्य जगासाठी एक सुसंगत आवाज आणि आंतरराष्ट्रीय कायदा तसेच शांततेसाठी आमची बांधिलकी ही कारणे आहेत की, भारताच्या उदयाचे जगात स्वागत केले जात आहे, असे नरेंद्र मोदी यांनी सांगितले.