|
|
पंचांग Vrittabharati
मास : | वार : | तिथी :
नक्षत्र : | राशी :
करण : | योग :
सूर्योदय : 05:59 | सूर्यास्त : 18:47
अयनांश :
हवामान

किमान तापमान : 28.8° C

कमाल तापमान : 28.99° C

तापमान विवरण : few clouds

आद्रता : 84 %

वायू वेग : 4.28 Mps

स्थळ : Mumbai, IN

28.99° C

Weather Forecast for
Monday, 06 May

28.65°C - 29.92°C

sky is clear
Weather Forecast for
Tuesday, 07 May

28.31°C - 29.9°C

sky is clear
Weather Forecast for
Wednesday, 08 May

28.18°C - 29.79°C

sky is clear
Weather Forecast for
Thursday, 09 May

27.85°C - 29.19°C

sky is clear
Weather Forecast for
Friday, 10 May

28.08°C - 29.61°C

few clouds
Weather Forecast for
Saturday, 11 May

28.1°C - 29.3°C

few clouds
Home » अमेरिका, आंतरराष्ट्रीय » संयुक्त राष्ट्रात ‘गाझा युद्धबंदी’ ठराव

संयुक्त राष्ट्रात ‘गाझा युद्धबंदी’ ठराव

– मतदानात भारत अनुपस्थित; कारण केले स्पष्ट,
न्यू यॉर्क, (२८ ऑक्टोबर) – इस्रायल-हमास युद्धाने संपूर्ण जगातील तणाव वाढला आहे. संयुक्त राष्ट्रसंघाच्या आमसभेत गाझा युद्धबंदीचा ठराव मांडण्यात आला. या ठरावावरील मतदानात भारत अनुपस्थित राहिला तसेच त्याचे कारणही स्पष्ट केले. जॉर्डनने गाझा युद्धबंदीसंदर्भातील ठराव शुक्रवारी संयुक्त राष्ट्रसंघाच्या आमसभेत सादर केला. या ठरावाला व्यापक समर्थन मिळाले. मात्र, हमासला दहशतवादी घोषित न केल्यामुळे अमेरिकेने तीव्र संताप व्यक्त तेला. या ठरावावेळी भारताने अलिप्त भूमिका घेतली आणि मसुद्याच्या ठरावावर मतदान करण्यापासून दूर राहिला. भारताव्यतिरिक्त ऑस्ट्रेलिया, कॅनडा, जर्मनी, जपान, युक्रेन आणि ब्रिटन हे देशही मतदानापासून दूर राहिले.
‘नागरिकांचे संरक्षण आणि कायदेशीर आणि मानवतावादी जबाबदार्यांचे पालन’ या मथळ्याच्या ठरावाचे १२० देशांनी समर्थन केले तर, १४ जणांनी विरोधात आणि ४५ देशांचे प्रतिनिधी मतदानावेळी गैरहजर राहिले. मानवतावादी मदतीसाठी तत्काळ युद्धविराम करावा, असे आवाहन भारताने केले. भारत मसुद्यावर मतदान करण्यापासून दूर राहिला. कारण, त्यात दहशतवादी संघटना हमासचा उल्लेख नव्हता. या मसुद्यात गाझापट्टीला विना अडथळा मानवतावादी मदतीची मागणी करण्यात आली आहे. त्याला बांगलादेश, मालदीव, पाकिस्तान, रशिया आणि दक्षिण आफ्रिकेसह ४० हून अधिक देशांचा पाठिंबा मिळाला.
गाझा युद्धबंदीवरील ठराव मतदानावेळी भारताने घेलेल्या अलिप्त भूमिकेबाबत संयुक्त राष्ट्राच्या आमसभेत भारताच्या राजदूत योजना पटेल यांनी सांगितले की, ७ ऑक्टोबर रोजी इस्रायलवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा आम्ही त्याचा निषेध करतो. ओलिसांची तत्काळ बिनशर्त सुटका करण्यात यावी, अशी आमची मागणी आहे. जगाने दहशतवादी कृत्यांचे कोणतेही समर्थन करू नये. मानवतावादी संकटाकडे लक्ष देण्याची गरज आहे. गाझामधील लोकांना मानवतावादी मदत पोहोचवण्याचे स्वागत करतो.

Posted by : | on : 28 Oct 2023
Filed under : अमेरिका, आंतरराष्ट्रीय
Author Description : .
You can follow any responses to this entry through the RSS 2.0
You can leave a response or trackback to this entry

Related posts

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g