किमान तापमान : 31.18° C
कमाल तापमान : 33.72° C
तापमान विवरण : few clouds
आद्रता : 53 %
वायू वेग : 7.33 Mps
स्थळ : Mumbai, IN
33.72° C
29.44°C - 34.99°C
few clouds29.2°C - 30.98°C
sky is clear28.84°C - 31.52°C
sky is clear29.09°C - 30.78°C
sky is clear28.67°C - 30.85°C
few clouds28.79°C - 30.28°C
light rainलंडन, (१३ जुलै) – भारतीय आचारसंहितेत सुधारणा करण्याच्या प्रयत्नात बौद्धिक संपदा (आयपी) अधिकार व आधुनिकीकरण यावर इंग्लंडसह अनेक अर्थव्यवस्थांसोबत काम सुरू आहे, असे केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल यांनी सांगितले. इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाऊन्ट्ंटस ऑफ इंडियाच्या (आयसीएआय) इंग्लंड शाखेतील भारतीय वंशाच्या सनद लेखापालांच्या मेळाव्याच्या समारोप समारंभात ते बोलत होते. यावेळी त्यांनी आयपी अधिकार आणि कॉर्पोरेशन कर ते पर्यावरण, सामाजिक आणि कॉर्पोरेट गव्हर्नन्स (ईएसजी) अशा विविध विषयांवर लेखापालांशी संवाद साधला. आंतरराष्ट्रीय मानकांशी सुसंवाद साधण्याची प्रकि‘या सरकारच्या अजेंड्यावर अग‘स्थानी आहे. कारण, भारतीय अर्थव्यवस्थेच्या वेगवान वाढीसाठी मानके आणि आयपीवरील जागतिक विचारांशी एकरूप होणे महत्त्वाचे आहे, असे ते म्हणाले.
इंग्लंडसोबत आम्ही बौद्धिक संपदा (आयपी) अधिकार व आधुनिकीकरण यावर काम करीत असून त्याच्याशी संबंधित क्षेत्रांबद्दल भारतीय आचारसंहिता सुधारण्याचा आमचा प्रयत्न आहे, परंतु ही प्रकि‘या थोडी अधिक हळूहळू करावी लागेल, असे ते म्हणाले. त्याचप्रमाणे, आम्ही भारतात गुणवत्ता मानकांवर अतिशय सकि‘यपणे काम करीत आहोत. खाद्येतर उत्पादनांसाठी भारतीय मानक ब्युरो (बीएसआय) आणि खाद्य उत्पादनांवरील भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरण (एफएसएसएआय) मानके विकसित करण्याचा प्रयत्न करीत आहोत. त्याकरिता शक्य तिथे आम्ही आंतरराष्ट्रीय मानकांशी सुसंवाद साधण्याचा प्रयत्न करीत आहोत. आम्ही साधारणपणे स्वीकारल्या जाणार्या मानकांशी साधारणतः ९० टक्के सुसंगत आहोत, असे ते म्हणाले. जर आपल्याला आपली अर्थव्यवस्था जलद गतीने विकसित करायची असेल तर आपल्याला जागतिक स्तरावर, बौद्धिक मालमत्तेवर विचार करून स्वतःला समाकलित करावे लागेल. याबाबत भारत सरकार जागरूक आहे. ही एक प्रकि‘या असली तरी, आम्ही खूप वेगाने पुढे जात आहोत, असेही ते म्हणाले.