किमान तापमान : 27.34° C
कमाल तापमान : 28.03° C
तापमान विवरण : scattered clouds
आद्रता : 69 %
वायू वेग : 1.06 Mps
स्थळ : Mumbai, IN
27.34° C
26.99°C - 30.64°C
sky is clear27.62°C - 30.93°C
sky is clear27.82°C - 31.09°C
sky is clear28.3°C - 31.08°C
sky is clear28.42°C - 30.7°C
sky is clear27.95°C - 30.1°C
sky is clear– भारतीयांसोबत जुळलेला राहील,
नवी दिल्ली, (०७ सप्टेंबर) – हिंदू असण्याचा मला गर्व आहे. माझी पत्नी भारतीय असण्यासोबतच गौरवान्वित हिंदू होण्याच्या नात्याने मी नेहमी भारत आणि भारतीय लोकांसोबत जुळलेला राहील. माझ्या भारतीय मुळाचा आणि भारतासोबत असलेल्या संबंधांचाही मला अतिशय गर्व आहे, असे प्रतिपादन ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांनी बुधवारी वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत केले. जगासमोर येणारी सर्वांत मोठी आव्हाने परतवण्यासाठी आम्ही जी-२०च्या अध्यक्षतेच्या माध्यमातून भारतासोबत काम करू. २०२३ भारतासाठी खूप मोठे वर्ष आहे, असे सुनक यांनी सांगितले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत होणार्या भेटीबाबतही त्यांनी वक्तव्य केले. त्यांच्या भेटीत मला जागतिक आव्हानांवर चर्चा करण्याची संधी मिळणार आहे आणि ही आव्हाने परतवण्यासाठी भारत आणि बि‘टनला मोठी भूमिका पार पाडायची असल्याचे मी त्यांना सांगणार आहे. अलिकडेच खलिस्तान्यांनी भारताच्या विदेशातील उच्चायोगांवर हल्ले केले. लंडनमध्येही असे प्रकार झाले. ब्रिटिश पोलिस अशा प्रकारच्या हिंसक कृत्यांवर अंकुश ठेवण्यासाठी सशक्त असल्याचे सुनक यांनी खलिस्तानी समर्थकांच्या हिंसाचारावर विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना सांगितले.
जी-२० संमेलन योग्य वेळी
ऋषी सुनक यांना पीटीआयने प्रश्न पाठवले होते. त्यानंतर त्यांनी ई-मेलच्या माध्यमातून त्याची उत्तरे दिली होती. बि‘टन आणि भारतामधील संबंध दोन्ही देशांचे भविष्य ठरवतील, त्यापेक्षा ते वर्तमानाची व्या‘या करीत आहेत, असे सुनक यांनी मुलाखतीत म्हटले. भारताची विविधता आणि त्याच्या विलक्षण यशाचा अर्थ असा आहे की, हा देश योग्य वेळी जी-२० चे अध्यक्षपद भूषवणारा आहे. जागतिक अर्थव्यवस्था स्थिर करण्यापासून ते वातावरणातील बदलांना तोंड देण्यापर्यंत जगासमोर येणारी आव्हाने परतवण्यासाठी आम्ही जी-२० च्या अध्यक्षतेच्या माध्यमातून भारतासोबत काम करू. सोबतच युक्रेन-रशियातील युद्धाचा उल्लेख करताना त्यांनी सांगितले की, जर रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांना सार्वभौम शेजार्यावर आक‘मण करण्याची परवानगी दिली तर, त्याचे परिणाम संपूर्ण जगासाठी अतिशय भयानक होतील.